Monday, 22 October 2012

मराठा सेवा संघ ही आता एक व्यवस्था झाली आहे - पुरुषोत्तमजी खेडेकर.


जळगाव (दि. 15 जुलै ) - 'मराठा सेवा संघाच्या 21 वर्षाच्या कालावधीत पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केलेल्या कार्याच्या जोरावर मराठा सेवा संघ हि आता संघटना राहिली नसून ती व्यवस्था झाली आहे' अशी भूमिका युगपुरुष पुरुषोत्तमजी खेडेकर यांनी जळगाव येथे झालेल्या मराठा सेवा संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत उपस्थित पदाधिकार्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केली. या प्रसंगी विचारपीठावर मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष इंजि. शिरीष जाधव, कार्याध्यक्ष कामाजी पवार , प्रदेश सचिव मधुकर मेह्करे आदी मान्यवर उपस्थित होते. पदाधिकार्यांना मार्गदर्शन करताना खेडेकर साहेब पुढे म्हणाले कि, महामानवांनी प्रचंड कार्य केले. परंतु ते व्यवस्था निर्माण करू शकले नाही. याचा कार्यकर्त्यांनी गांभीर्याने विचार करावा. मराठा सेवा संघ हि केवळ इंजिनिअर किंवा कर्मचार्यांचे हित जोपासण्यासाठी निर्माण केलेली संघटना नाही तर कर्मचार्यांनि एकत्र येवून समाजाच्या प्रगतीसाठी कार्य हि अपेक्षा आहे. कोणत्याही संघटनेत सेवा करताना मेवा घेणाऱ्यांची संख्या असतेच अशा लोकांनी मेव्याचा काही भाग तरी संघटनेला दिलाच पाहिजे, पुण्यात तुमचा नातेवाईक अडचणीत आला तर आम्हाला फोन करता परंतु हा नातेवाईक मराठा सेवा संघाच्या कार्यक्रमात का दिसत नाही हि हरामखोरी आहे. संघटनेत शाशकीय पातळीसारखी यंत्रणा राबवता आली पाहिजे गावात एक तरी संघटनेचा प्रतिनिधी असावा. प्रत्येक पदाधिकार्यांना सदस्य म्हणून बोलता आले पाहिजे. त्यासाठी फक्त काम करण्याची हौस असल्याबरोबरच निष्टा व झोकून देण्याची वृत्ती हवी. पदाधिकारी हा मांजरी सारखा असावा कसेही फेकले तरी चार पायावर त्याला राहता यावे. पदाधिकार्यांनी एखादा तरी छंद असा जोपासावा कि त्या क्षेत्रातील काहीही प्रश्न निर्माण झाला तर तुमच्याशीच संपर्क साधला जावा. मराठा सेवा संघात सध्या जी शिथिलता निर्माण झाली आहे. त्याचे कारण असे तर नाही कि गुरुत्वाकर्षण शक्तीचा एक नियम आहे एखादी वरफेकलेली वस्तू एका उंचीवर जावून खालीच येते असे होवू नये. मराठा सेवा संघ कोणाही पदाधिकाऱ्यांची खासगी प्रॉपरटी न होता नवीन कार्यकर्ते संघटनेत आले पाहिजे त्यासाठी प्रोग्राम हवा . कोणतीही चळवळ यशस्वी व्हायची असेल तर त्यास राजकीय पाठींबा हवा . त्यासाठी राज्यकर्त्यावर आपला अंकुश ठेवता आला पाहिजे . परंतु आपण सामाजिकदृष्ट्या पन्नास हजार लोक एकत्र आणू शकतो परंतु त्यातील 50 लोकही आपण मतदानाच्या दृष्टीने परावर्तीत करू शकत नाहीत यावर गांभीर्याने विचार करा . आपण बदलत नाही तेच तेच लेख, तीच तीच भाषणे किती दिवस करणार ? हा प्रश्न उपस्थित करून खेडेकर साहेब यांनी नवीन कार्यक्रम लावण्याचे आवाहन केले . त्याचे उदाहरण देताना ते म्हणाले कि सध्या राजकुमार तांगडेयांचे 'शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला' हे नाटक पाहण्यासारखे आहे याचे किमान 10 प्रयोग तरी मराठा सेवा संघाच्या वतीने लावा . मराठ सेवा संघाच्या कार्यकर्त्यांना शोधून चहापानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करा . PDSP व वीर भगतसिंहविध्यार्थी परिषद ( VBVP ) या संघटनांनी टायलेंट शोधून काढावेत . आपले खरे कार्यकर्ते छोट्या पेपरचे वाचक आहेत . त्यामुळे अशा छोट्या पेपरला बातम्या , लेख द्या . कार्यकर्त्यांनी पैसे खर्चायला जसे आवडते तसे जमा करता आले पाहिजे . कार्यकर्ता सतत फिरता हवा सध्या ब्रिगेडीयर सुधीर सावंतमहाराष्ट्रभर रात्रंदिवस फिरत असून त्यानंतर प्रदीप सोळुंकेचा नंबर लागतो . यांचा आदर्श घ्या . सिंदखेडराजा येथील पाण्याचा प्रश्न इंजि. चंद्रशेखर शिखरे यांच्या प्रयत्नाने सुटला आहे . आपले अनेक पदाधिकारी संघटनेत काम करताना घराकडे दुर्लक्ष करतात आपले कुटुंब नातेवाईक समाजात येत नाहीत काय ? असा प्रश्न विचारून खेडेकर साहेब यांनी सर्वाना कुटुंब नातेवाईकांकडे लक्ष देण्याचे आश्वासन केले .या प्रसंगी शिवराज्यपार्टीच े प्रदेशाध्यक्ष ब्रिगेडीअर सुधीर सावंत , जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष वासंती नलावडे , वीर भगतसिंह विध्यार्थी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप सोळुंके , पंजाबराव देशमुख शिक्षक परीशधेचे प्रदेशाध्यक्ष पप्पू पाटील भोईर , संभाजी ब्रिगेड चे महासचिव मनोज आखरे , वधूवर सूचक कक्षाचे प्रदेशाध्यक्ष बी.टी. देवरे , जगन सरकटे व सर्व पदाधिकारी उपस्थित होते .

Sunday, 9 September 2012

विचारांचा जागर: शेंडी जाळो अभियान

विचारांचा जागर: शेंडी जाळो अभियान: शेंडी जाळो अभियान.                                    होय.. होय... होय...! अगदी योग्य वाचले तुम्ही.... जे वाचायला हवं, नव्हे तर...

Friday, 24 August 2012

V.B.V.P.विद्यार्थांना दिशा देणारी संघटना


भारत  - जगातील सर्वात मोठा लोकशाही प्रधान देश.
- जगात लोकसंख्येत दोन नंबरचा देश.
- अनेक परकीय आक्रमणे पाहिलेले, आक्रमणे पचवलेला देश.
- एकेकाळी स्वयंपूर्ण खेडी असलेला देश.
- एकेकाळी टाचणी न तयार होणारा व आज उपग्रह तयार करणारा देश .
- सर्व जगाला मजूर, तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ पुरविणारा देश.
- क्रिकेटमध्ये 'वर्ल्डकप' जिंकणारा देश.
- इ.स.२०२० ला जागतिक महासत्ता होण्याचे स्वप्न पाहणारा देश.
दुसरी बाजू - शेतकर्यांच्या आत्महत्या होणारा देश.
- धार्मिक, जातीय दंगली करणारा देश.
- कर्मकांडात अडकलेला देश.
- तरुणांच्या हाताला काम व बुद्धीला दिशा न मिळालेला देश.
- ऑलीम्पिक २०१२ लंडन मध्ये एकही सुवर्ण पदक न मिळालेला देश.
- स्त्री अर्भकांचा गर्भपात करणारांचा देश.
         भारत इ.स. २०२० ला महासत्ता होणार अशी चर्चा सध्या भारतामध्ये विद्वान व प्रचार प्रसार माध्यमे करत आहेत. इ.स. २०२० यायला अजून आठ वर्षे बाकी आहेत. या आठ वर्षात भारत महासत्ता होणार म्हणजे नेमके काय होणार? हे ज्यांच्या सामर्थ्यावर भारत देश महासत्ता बनवायचा त्या तरुणांनाच नेमके कळलेले नाही. भारत महासत्ता बनणार म्हणजे नेमके काय? आम्ही सैनिकी हल्ले करून सर्व जग ताब्यात घेणार ? आमच्या भारतीय कंपन्या इतर देशात जाऊन सर्व व्यापार ताब्यात घेणार? नेमके काय करणार? हेच भारतीय तरुणांना नेमके माहित नाही. बर्याच तरुणांना तर तालुका, जिल्हा, राज्य, देश, खंड यातील फरकही निट कळत नाही. मग भारत महासत्ता होणार कसा? बरे क्रिकेट सारखी महासत्ता होण्याची काही स्पर्धा आहे का? म्हणजे अंतिम सामना फिक्सिंग करून जिंकावा व भारताला महासत्ता बनवावे अशी काही तरतूदही नाही. या देशातील तरुणांना महासत्ता होणे म्हणजे काय? हेच अजून माहित नाही आणि आम्ही भारताला महासत्ता बनविण्याचे स्वप्न पाहत आहोत.
         स्वप्न पाहणे गुन्हा नाही. स्वप्न पाहण्याला ट्याक्सहि नाही. मोठी स्वप्ने अवश्य पहावितच परंतु या स्वप्नपूर्ती साठी नियोजन नावाचा काही भाग असतो. त्या नियोजनाची अंमलबजावणी व्हावी लागते. या अंमलबजावनीला प्रतिसाद मिळावा लागतो त्यासाठी अहोरात्र कष्ट करून झोकून देणारी माणस निर्माण करावी लागतात नव्हे अशी मानस निर्माण व्हावी लागतात तरच या स्वप्नांची पूर्तता होत असते. मला सांगा भारत महासत्ता बनविण्याचे कोणते प्रयत्न या देशात होत आहेत? ज्या देशात मुलगी नको वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा असा हट्ट धरला जातो . बरे मुलगा झाल्यावर त्याला दिशा देण्याचा त्याच्यावर काही संस्कार करण्याचा प्रयत्न पालक करत आहेत काय? माझे तर असे मत आहे कि घरात जसे कुकर, फ्यान, मिक्सर, ग्यास, फ्रीज असावे तसा मुलगाही असावा अशी आमच्या समाजाची मनोवृत्ती आहे. मुलगा होत नसेल तर बाराभानगडी करून पाण्यासारखा खर्च करतील, पैसे नसतील तर कर्जबाजारी होतील पण मुलगा होण्यासाठी गंड्या दोर्यापासून टेक्सट्यूब बेबीपर्यंत प्रयत्न करतील. मुलगा झाल्यावर प्रचंड खर्च करून वाढदिवस  साजरा करतील परंतु त्या मुलावर शिक्षणासाठी, विविध कला शिकण्यासाठी पुन्हा खर्च करणार नाहीत. भारताला आत्ता ऑलीम्पिक मध्ये एकही सुवर्ण पदक मिळाले नाही म्हणून बोंबलनारे आपला मुलगा, मुलगी ग्राउंडवर जाणार नाही याची काळजी घेतात. बरे या मुलांसाठी मोकळी जागा राहिली कोठे? की जेथे मुलांनी जाऊन खेळावे, खेड्यात पूर्वी गायरान असायचे ते गेले. शहरात अतिक्रमणे वाढली सोसायटीच्या मोकळ्या जाग्यावर चढाओढीने मंदिरे बांधली, मुले खेळणार कोठे? एखाद्याला फारच इच्छा झाली तर त्याला क्रीडा साहित्य उपलब्ध होत नाही, झाले तर महाग. शाळेत खेळाचातास नाही, असेल तर क्रीडा शिक्षक  नाही, तो असेल तर त्यालाच खेळाची आवड नाही. खेळाडू घडणार कसे? गजगे, गोट्या, लंगडी,हुतुतू,सूरपारंभ्या, लगोरचे आमचे हे खेळ आंतरराष्ट्रीय नाहीत व आंतरराष्ट्रीय खेळ आम्हाला येत नाहीत. सुवर्ण पदक मिळणार कसे?
              अजूनही आमच्या देशातील तरुणांना देशावर प्रेम करणे याचा अर्थ फक्त सैन्यात जाऊन हातात बंदूक घेऊन सीमेवर उभे राहणे म्हणजे देशप्रेम समजतात. या देशाला खेळात सुवर्ण पदक मिळवून देणे, शेतीतील उत्पन्न वाढविणे, उद्योगधंद्याची प्रगती करणे, नवीन नवीन तंत्रज्ञान निर्माण करणे, धरणे बांधणे, कालवे काढणे, सैन्यात भरती होणे, मोठमोठ्या इमारती उभारणे, रस्ते बांधणे, रेल्वे जाले निर्माण करणे, प्रत्येक जिल्हा हवाई मार्गाने जोडणे, विध्यार्त्याना शिकविणे, विज्ञाननिष्ठ अभ्यासक्रम निर्माण करणे, इच्छाशक्ती व नजर असलेली मानस निवडून देणे, निवडून आल्यावर देशासाठी आहोरात्र काम करणे, वक्ता, लेखक, नाटककार, शाहीर, चित्रकार, पत्रकार, कीर्तनकार होऊन मनोरंजनातून जनजागृती करणे, डॉक्टर होऊन जनतेच्या आरोग्याची काळजी घेणे थोडक्यात आपण आहोत त्या क्षेत्रात झोकून देऊन काम करणे म्हणजेच देशसेवा असते. अगदी तुम्ही परदेशात जाऊन परकीय चलन देशात पाठविणे ही सुद्धा देशसेवाच आहे. त्यामुळे फक्त सैन्यात जाने म्हणजेच देशसेवा हे अगोदर तरुणांच्या डोक्यातून जाने अत्यावश्यक आहे. याचा अर्थ असा नाही की सैन्यात गेल्यावर देशसेवा होत नाही. सैन्यात गेल्यावर तर देशसेवा होतेच तसेच या देशात राहून रस्ता झाडण्यापासून मोठमोठ्या बिल्डींग बांधण्यापासून स्वयंपाकी होण्यापर्यंत कोणतेही कार्य झोकून देऊन करणे म्हणजेच देशसेवा असते. हा विचार तरुणापर्यंत गेला की भारत महासत्ता होण्यास वेळ लागणार नाही.
                भारतात अजूनही तरुणशक्ती दुर्लक्षित आहे. लहानपणापासून श्रमप्रतिष्ठा मूल्य समजाविणे अत्यावश्यक आहे मुलावर संस्कार होणे, त्यांना प्रोत्साहन मिळणे अत्यावश्यक आहे दुर्देवाने असे होत नाही. या देशातील बालकांसाठी बालसाहित्य उपलब्ध नाही. त्यांना कोणीही स्वप्न दाखवीत नाही, प्रेरणा देत नाही, लहानपणी आई म्हणते 'जन्मल्या जन्मल्या नख लावलं असते तर बरे झाले असते'. वडील म्हणतात 'वाया गेलेलं पोरग आहे'. शाळेत जावे तर शिक्षक म्हणतात 'काहीच येत नाही नालायक बस खाली'. यातून काय प्रेरणा घेणार बोला?
                या सर्वांचा अभ्यास करून मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुशोत्तमजी खेडेकर यांनी वीर भगतसिंह विध्यार्थी परिषद या मराठा सेवा संघाच्या स्वतंत्र कक्षाची निर्मिती करून या देशातील विद्यार्थ्यांना मोठी स्वप्न दाखविणे, त्यांना प्रेरणा देणे, त्याच्यातील सुप्तगुणांना हेरून त्यांची सर्वांगीण प्रगती करणे या हेतूने VBVP ची स्थापना केलेली आहे.
                आज महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यात VBVP कार्यरत असून २८ नोव्हे २०१२ ला माजलगाव जि.बीड येथे VBVP चे राज्य अधिवेशन असून नोव्हे २०१३ ला औरंगाबाद येथे राष्ट्रीय अधिवेशनाचे नियोजन सुरु आहे. महाराष्ट्रातील विध्यार्थी VBVP कडे प्रेरणा देणारी, दिशा देणारी संघटना म्हणून पाहत आहे कारण VBVP मध्ये विध्यार्त्याचा वापरा आणि फेकून द्या असा ' कडीपत्ता' होणार नाही. वकृत्व, नेतृत्व,कर्तृत्व याचे प्रशिक्षण देणारी ही संघटना असून मोठे झाल्यावर समाजाकडे 'वळून पाहणारे' नागरिक यातून निर्माण होणार आहेत.  VBVP म्हणजे जगाला गवसणी घालणारे नागरिक निर्माण करून भारत महासत्ता बनविणारे संघटन आहे.
परवा एक sms आला तो पुढील प्रमाणे 
' इस देश का क्या होगा क्योंकी 
 बुढे लोग देश चला रहे है और
 जवां लोग फेसबुक खेळ रहे है ! '
या फेसबुक खेळणाऱ्या तरुणांना देश चालविण्यास सक्षम करणे व त्यातून व्यवस्था परिवर्तन करणे हेच VBVP चे अंतिम उद्दिष्ट आहे.






                    -प्रदीप सोळुंके
                     प्रदेशाध्यक्ष
                     वीर भगतसिंह विध्यार्ती परिषद,
                     मोब. ९४२२२९५१५२

Saturday, 18 August 2012

शिवधर्मसंस्कार विधी

हे सर्वच आनंद व्यक्त करण्यासाठी आहेत. हा आनंद आपापल्या सामाजिक -आर्थिक कुवतीनुसार व्यक्त व्हावा, कर्ज काढून वा उधल पट्टी करूनव्यक्त करू नये. सामुहिकतेवर भर असावा,याचा अर्थ त्याचे स्वरुप दरिद्री असावे असा घेऊ नये. 1 ) नहान संस्कार:- मुलगी वयात आल्यावर करावयाचा विधी . २) गर्भाधान संस्कार:- कुटूम्बतिल स्त्री गर्भवती झाल्याचे निश्चित झाल्यावर त्याविषयीचा आनंदसोहला साजरा करावा. गर्भवतीस सर्व प्रकारचा धीर द्यावा, तपासन्या कराव्यात. गर्भाधान सोहला गीत माऊली गे उद्याची,वांछितो ं सारयांसवे, स्वास्थ्य लाभावे निरामय तुज गडे बालासवे ध्रु कूस उगवे गे तुझी अन्,सुखविले सारयांस तू, स्पंदनांना लय दिली अन्, मोकले आकाश तू; नाद तुझिया अंतरीचा, वाहवी श्वासांसवे...स् वास्थ्य लाभावे..... माऊलीचे धन्य जीवन, अनुभाविशी तू या क्षणी, गौरवाया तुज गडे हे, शब्द अपुरे औक्षणी; दाटला आनंद आणिक ,चिंब नयनी आसवे...स्वास्थ् यलाभावे..... ३) जन्म संस्कार:- कुटूम्बात स्त्री च्या प्रसूति नंतर आई व अपत्याच्या सुदृढ़तेसाठी आनंद साजरा करून नवागताचे स्वागत करावे. नवजात बालक कर्तृत्ववा न व्हावे या भावनेने सामुहिक आनंद व्यक्त करावा. ४) नामकरण संस्कार:- जिजाऊ पूजन करून अपत्याचे नामकरण करावे व त्यानिमित्त यथाशक्ति जिव्हाल्याच्या व्यक्तींसह स्नेह मिलन सोहला साजरा करावा.अपत्याचे नाव प्रेरणादायक राहिल असे आपल्या आवडीने ठेवावे.पूर्ण नाव लिहिताना बालकाचे नाव, आईचे नाव, वड़ीलांचे नाव, आड़नाव, असे लिहावे ,शिवधर्म नावे वापरावित. ५) बाल संस्कार:- बाल संस्कार हे भावी आयुष्यातील वाटचालीसाठी दिशादर्शक असतात,बालकास जाणीवपूर्वक घड़विन्यासाठी या संस्काराची गरज आहे. ६) शिक्षण संस्कार:- मूल पहिल्यांदा शाळेत जाण्याच्या दिवशी तसेच घरातून बाहेर पड़न्या पूर्वी जिजाऊ पूजनव प्रार्थना म्हणून शाळेत पाठवावे. मूल आनंदाने शाळेत जावे. ७) समाजऋण संस्कार:- समाजामध्ये स्वतःचे सामाजिक जीवन आणि समाजाचे सामाजिक जीवन,राष्ट्र जीवन सशक्त होंन्यासाठी समता,स्वातंत्र् य,बंधुत्वाचा व्यवहार व न्याय बुद्धि ह्यांची जाणीव करवूनदेणारा सोहला आपणास आदरणीय वाटनारया कोणत्याही स्त्री-पुरुषाच् या जयंतिला कुटूम्बात करावा किंवा पुर्वजाचे स्मरण म्हणून आपल्या कुटूम्बातील व्यक्तिच्या जयंतिदिनी हा सोहला करावा व समाजप्रती कृतज्ञता व्यक्त करने. ८) सामुहिक नागरी संस्कार:- प्रत्येक शिवधर्मीय व्यक्ति ही देशाची सुबुद्ध व सशक्त नागरि क असावा यासाठी हा संस्कार आहे. राज्यघटना परिचय - नागरी परिचयकरावा. ९) आपकमाई संस्कार:- कुटुम्बातील व्यक्ति प्रथम उद्योगव्यवसाय,न ोकरी अशा पद्धतिच्या आपकमाईस जाइल त्यावेळी त्यास प्रोत्साहन मिळेल असा आनंद व्यक्त करावा . १०) विवाह संस्कार :- कुटुम्बातिल मुलीचा विवाह १८ वर्षे वय झाल्यावर करावा व मुलाचा विवाह २१ वर्षे वय झाल्यावर करावा ( याविषयी कायद्याचे पालन करावे ) विवाह संस्कारात नाते संबंध पाहने,मुला-मुली ची विविध क्षेत्रीय माहिती पाहने,मुलगा-मुल गी पाहने, पसंति, कुंकू ,साखर पुडा इतर सामाजिक सोपस्कार,प्रत्य क्ष विवाह संस्कार अशा बाबिंचा समावेश आहे ११) सामाजिक संबंध :- सामजिक व कौटूम्बीक संबंध मानवी व सहज असावेत, आपली वाटचाल, गणगोत व इतरांचा आदर करून सहजीवन जगण्याची प्रेरणा यातून मिळावी. १२) गृहप्रवेश संस्कार :- जिजाऊपूजन करून व अधिकृत प्रार्थना करून गृहप्रवेश करावा,प्रबोधन कार्यक्रम करावा, आनंद उत्सव करावा, कामगार, मजूर, कारागिराना सन्मानित करावे. १३) आनंद उत्सव संस्कार :- जीवनातील कोणत्याही आनंदाच्या प्रसंगी आनंदउत्सव साजरा करावा.याचे स्वरुप सोयीनुसार असावे, उदा. वाढदिवस, परीक्षा पास होणे, प्रमोशन होणे, व्यवसायात फायदा होणे, व्यवहारात बदल होणे, लग्नाचा वाढदिवस, परदेशप्रवास ईत्यादी १४) मृत्यु संस्कार :- शिवधर्मीय व्यक्तीला मृत्यु आल्यास खालीलपैकी एक पर्याय निवडता येईल: १) देहदान २) दाहसंस्कार ३) मृत्तिका संस्कार ( पुरने ) १५) मृत्योत्तर संस्कार :- सविस्तर विधि कार्यक्रमासाठी "शिवधर्मं भाग २ व ३" या जिजाई प्रकाशन , पुणे च्या पुस्तकांचा वापर करावा हे संस्कार विधि जिजाऊसृष्टि सिंदखेडराजा,जिजाई प्रकाशन पुणे येथून प्रकाशित झाले आहेत . "शिवधर्म ठरावा विश्वधर्म".....

Monday, 13 August 2012

वाघ्या कुत्रा हटवाच !!!!!

वाघ्याचा गोंडा आणि वाघ्या समर्थक... रायगडावरून वाघ्या हटविल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांनी असे चित्र उभे केले कि वाघ्या हटविन्याला रायगड स्थानिक लोकांचा विरोध आहे आणि ते संभाजी ब्रिगेडच्या विरोधात गेलेआहेत आणि tv वर पण अश्याच लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या ज्यांना वाघ्या नावाचंकुत्र देखील ओळखत नाही आणि जे संभाजी ब्रिगेड चा द्वेष करण्यात शेपटीला भाशिंग बांधून तयार असतात पण सत्य काहीतरी वेगळेच आहे रायगड मधील मराठा समाज तर ब्रिगेडच्या पाठीशी होताच पण इतर समाज देखील वाघ्याला हटाव ह्याच भूमिकेचा होता पण प्रसिद्धी माध्यमांनी हि बातमी मुद्दामून दडवली आणि महाराष्ट्त्रातल ्या लोकांसमोर वेगळेच चित्र निर्माण केले.पुढे काही बहुजन समाजातल्या विविध जातीच्या नेत्यांच्या वाघ्याविशयीच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत त्यावरून सत्य काही तरी वेगळेच आहे हे कळत.रायगड कोकणस्थ तेली समाजसेवा संस्था सल्लागार आणि विचारवंत श्याम घोडके,चर्मकार संघटना रायगड जिल्हाध्यक्ष प्रदीपभाई भोयर,रायगड जिल्हा बुरुड समाज अध्यक्ष संदेश्भाई नागे,बाबासाहेबा ंचे नातू आनंदराजआंबेडकर,नव्बौद् धांचे नेते जोगेंद्र कवाडे,आदरणीय वामन मेश्राम साहेब ह्या सर्व जातीय नेत्यांनी संभाजी ब्रीगेद्चीच बाजू घेतली आणि वाघ्या हा शिवरायांच्या अपमानाचा क्षण आहे आणि तो उद्ध्वस्तच केला पाहिजे हेच सांगितले तसेच प्रसिद्धी माध्यमांनी दुसरी एक वावडी उठवली कि धनगरांचा वाघ्या काढण्याला विरोध आहे पण गोपाल कोल्हे वरिष्ठनेते धनगर समाज अकोला ह्यांनी रायगडावरील वाघ्या शिवरायांचीच नव्हे तर मल्हारराव होळकरांची बदनामी करणारा आहे म्हणून तो त्वरित हटवावा ह्या मागणीसाठी कल्लेक्टार कार्यालयासमोर दिवसभर धरणे धरा आंदोलन करून सामाजिक ऐक्याचे प्रदर्शन घडवले पण प्रसिद्धी माध्यमांनी जाणीवपूर्वक ह्या गोष्टी लपविल्या या सर्व लोकांच्या प्रतीक्रीयावरून एव्हढेच स्पष्ट होते कि वाघ्याला समर्थन देणार्यांच्या सोबत कुठलाचसमाज नाही तर फक्त वाघ्याचा गोंडा आहे आता तोगोंडा फक्त घोळायचा कि चोळायचा हा त्या समर्थकांचा प्रश्न आहे........
जय जिजाऊ ...... जय शिवराय..... जय मल्हार..... - शिवश्री प्रदीप इंगोले