Wednesday 28 March 2012

क्रांतिसिंह नाना पाटील

सामान्यतः सर्व समाज अगर माणसे कालप्रवाहाप्रमाणे वाहत जाण्यात धन्यता मानतात आणि यातच आपला मोठेपणा सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. परंतु जगाच्या इतिहासात अशा काही अद्वितीय व्यक्ती जन्माला येतात कि त्या सबंध कालचक्रालाच आपल्या कल्पनेप्रमाणे गती देतात. यातच त्यांचे मोठेपण सामावलेले असते. आणि हे विचार क्रांतिसिंह नाना पाटील यांना तंतोतंत लागू पडतात.

क्रांतीसिहांचा जन्म सांगली जिल्ह्यातील बहे-बोरगाव या छोट्याशा गावी ३ ऑगस्ट १९०० रोजी झाला. लहानपणापासूनच दणकट शरीरयष्टी लाभलेल्या नानांनी भारताला सामाजिक आणि राजकीय गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी तीव्र संघर्ष केला. स्वातंत्र्यपूर्व काळात ‘आधी राजकीय स्वातंत्र्य कि सामाजिक सुधारणा’ असा वाद अस्तित्वात होता. काहींनी आधी राजकीय स्वातंत्र्य योग्य मानले तर काहीना आधी सामाजिक सुधारणा इष्ट वाटत होत्या. परंतु नानांनी राजकीय स्वातंत्र्याबरोबरच सामाजिक सुधारणा घडवून आणण्याचे महत्कार्य पार पाडले, हे नानांच्या कार्याचे वेगळेपण आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महाराष्ट्राने विशेषतः सातारा-सांगली भागाने बहुमोल योगदान दिले आहे. याच भागातून पुढे आलेल्या नानांनी समविचारी तरुणांना एकत्र करून भारतीय स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ रोवली.

नाना सुरुवातीला तलाठी म्हणून नोकरीला होते. परंतु स्वातंत्र्याचे आंदोलन ऐन जोमात असताना नानांचे मन नोकरीत रमले नाही. त्यांनी नोकरी सोडून सक्रीय राजकारणात व समाजकारणात सहभाग घेतला. सातारा भागात प्रतिसरकार ही समांतर शासनव्यवस्था उभी करून ब्रिटीश सत्तेला चांगलाच चाप लावला. नानांनी तुफानी सेना ही सशस्त्र क्रांतीकारकांची संघटना बांधली. तुफानी सेनेच्या माध्यमातून इंग्रजी सत्तेला सळो कि पळो करून सोडले. ब्रिटीश सत्तेचा प्राण असणाऱ्या रेल्वे सेवा, पोस्ट सेवा आदी सेवांवर हल्ले करून, ब्रिटीशांचा खजिना लुटून नानांनी स्वातंत्र्यलढ्यासाठी त्याचा उपयोग केला.

१९३० चे सविनय कायदेभंग आंदोलन आणि १९४२ चे चाले जाव आंदोलन यात नानांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सक्रीय सहभाग नोंदवला. १९४२ पर्यंत नानांनी अनेकवेळा तुरुंगवास भोगला. १९४२ नंतर मात्र नाना भूमिगत झाले. ब्रिटीश सरकारने त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी हरप्रकारे प्रयत्न केले. त्यांच्या घरावर जप्ती आणली. त्यांच्या कुटुंबियांना त्रास दिला. नानांची जमीनही सरकारजमा केली गेली. परंतु घरावर तुळशीपत्र ठेवून स्वातंत्र्याच्या भुकेने बाहेर पडलेल्या नानांचा त्याग ब्रिटिशांना काय माहित ? या धावपळीच्या काळात आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्यायला नानांना वेळ मिळाला नाही. यातच नानांच्या मातोश्रींचे निधन झाले. स्वतःच्या आईचे अंत्यसंस्कार करण्यासाठी तरी नाना येतील म्हणून ब्रिटिशांनी पूर्ण बंदोबस्त लावला. तेव्हा नानांनी आपला जीव धोक्यात घालून आईचे अंत्यसंस्कार केले. मात्र ब्रिटिशांच्या तावडीत ते सापडले नाहीत. सामान्य जनतेची नानांना फार मोठी साथ लाभली. समाज नानांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याने ब्रिटीश सरकार नानांना पकडू शकले नाही. भारताला अधिकृतरीत्या १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले असले तरी सातारा सांगली भाग नानांच्या प्रयत्नांमुळे १९४२ पासूनच स्वतंत्र झाला होता. सातारा-सांगली भागात प्रतिसरकार कार्यरत असताना ब्रिटीश सत्तेचा मागमूस या भागातून जवळजवळ पुसून टाकण्यात आला होता.

सामाजिक कार्य-

नानांनी प्रतीसरकारच्या माध्यमातून जसे ब्रिटीशांविरुद्ध सशस्त्र आंदोलन उभे केले होते तसेच समाजात एक चांगली शासनव्यवस्था निर्माण केली होती. भांडणतंटे सोडवण्यासाठी लोकन्यायालयाची स्थापना करण्याचे महत्वाचे कार्य नानांनी केले होते. व्यसनमुक्तीसाठीही नानांनी प्रतीसरकारच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले. बहुजन समाजात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटलांच्या खांद्याला खांदा लावून नाना उभे होते. गावोगावी ग्रंथालये उभी करून समाजपरिवर्तनात मोलाची कामगिरी बजावली. नानांवर महात्मा फुल्यांचा व सत्यशोधक समाजाच्या विचारांचा विशेष प्रभाव होता. भटशाही व सावकारशाही गरीब शेतकऱ्यांना नाडत आहेत म्हणून नानांनी या प्रवृत्तींविरुद्ध आवाज उठवला. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामीही नानांचे योगदान खूप आहे. सातारा-सांगली भागात सुमारे १५०० गावात नानांचे प्रतिसरकार कार्यरत होते. सामान्य बहुजन समाज व शेतकऱ्यांवर होणाऱ्या प्रत्येक अन्यायाला प्रतिसरकारच्या माध्यमातून वाचा फोडली जाई. त्यामुळे सामान्य जनतेला प्रतिसरकार आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याबद्दल फार आत्मीयता होती.

सामान्य जनतेच्या सहभागावर आधारलेला विकेंद्रित लोकशाहीचा छोटा पण वेगळा प्रयोग म्हणजे प्रतिसरकार होय. नानांच्या प्रतीसरकारचा प्रयोग देशात इतरत्रही राबवला गेला. दारूबंदी, न्यायव्यवस्था, गुंडांचा बंदोबस्त, अस्पृश्यता निवारण, सावकारांकडून होणारी शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवणे, कमी खर्चात लग्ने लावणे असे प्रतीसरकारचे कार्यक्रम सामान्य बहुजन समाजाने उचलून धरले. समाजाला नाडणाऱ्या सावकारादि प्रवृत्तींना नानांच्या प्रतीसरकारचा चांगलाच धाक होता. गरीब शेतकऱ्यांवर, बहुजन समाजावर अन्याय करणाऱ्या बड्या धेंडांना प्रतीसरकारने पत्र्या ठोकल्या. त्यामुळे प्रतीसरकार हे ‘पत्रीसरकार’ म्हणूनही ओळखले जावू लागले. आज खर्चिक विवाह समाजामध्ये आर्थिक व सामाजिक ताण निर्माण करताना दिसत आहेत. परंतु त्याकाळी फक्त पंधरा रुपयात बहिणीचा व वीस रुपयात मुलीचा विवाह करणारे क्रांतिसिंह खरोखर कृतीवीर होते.

स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर गोरगरीब, दीनदलित व शोषितांसाठी आयुष्यभर लढत राहणाऱ्या क्रतीसिहांच्या कर्तुत्वाची महती आजच्या पिढीला समजली पाहिजे. सध्या स्त्री-शिक्षण व स्त्री सक्षमीकरणावर बोलले जात असले तरी शंभर वर्षापूर्वी स्वताच्या पत्नीला साक्षर करून समाजाला नवी दृष्टी देणारा हा दूरदृष्टा विरळच होता. या भूमीतील कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाची गंगा खेड्यापाड्यात पोहचवली, तर क्रांतीसिहानी स्वातंत्र्य चळवळीचे, सामाजिक सुधारणांचे लोण गावोगाव पसरवले. स्वातंत्र्य चळवळीबरोबरच त्यांनी शिक्षणप्रसार, स्त्री शिक्षण, व्यसनमुक्ती, हुंडाबंदी, जातीभेद निर्मुलन, अंधश्रद्धा निर्मुलन यासारख्या विषयांवरही सामाजिक प्रबोधन केले. “बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले” या उक्ती नानांना तंतोतंत लागू पडतात.

राजकीय कार्य-

त्याकाळी बहुजन समाजाला राजकीय नेतृत्व नव्हते. तत्कालीन कॉंग्रेसचे नेतृत्व उच्चवर्णीयांच्या हातात होते. त्यांना गरीब बहुजन समाज व शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे नव्हते. परिणामी बहुजन समाजाची खूप उपेक्षा होत होती. कॉंग्रेसची घडण ही परंपरागत चातुर्वर्ण वर्गाच्या नावाखाली चालत होती. त्यातून बहुजन समाजाच्या आर्थिक सोयीचे व कामाचे चीज होईल असे दिसत नव्हते. म्हणून महाराष्ट्रातील सर्व सत्यशोधक पुढाऱ्यांनी मिटींग घेतली. या मिटींगमध्ये कॉंग्रेस अंतर्गतच शेतकरी कामगार पक्षाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. सत्यशोधक कार्यकर्त्यांनी गावोगाव सभा-मिटिंग घेवून बहुजन समाजाला आपली भूमिका समजावून सांगितली. नानांनी यावेळी जनजागृतीसाठी केलेले दौरे महाराष्ट्रभर तुफान व वेगवान असे झाले. सर्वत्र नाना पाटील, जेधे, मोरे, जाधव आदींचा जयजयकार होवू लागला. सुरुवातीला शेतकरी कामगार पक्ष हे कॉंग्रेस अंतर्गतच एक संघटन होते. परंतु कॉंग्रेसच्या उच्चवर्णीय पुढाऱ्यांनी ‘महाराष्ट्रात कॉंग्रेस अंतर्गत कोणताही राजकीय पक्ष राहू शकत नाही’ असा ठराव पास करून घेतला. त्यांचे विचार व पद्धती न पटल्याने बहुजन समाजातील कार्यकर्ते कॉंग्रेसमधून बाहेर पडले व स्वतंत्र शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली.

नाना फक्त एक लढाऊ स्वातंत्र्यसैनिक होते असे नाही तर ते एक उत्तम वक्ते, पुरोगामी विचारवंत होते. त्यांचे विचार सहज-सुलभ व सर्वसामान्यांना समजेल असे होते. भाषांशैली लोकाभिमुख होती. आपल्या विचारांमुळे व कार्यामुळे ते सर्वसामान्य जनतेत लोकप्रिय झाले होते. ते १९५७ साली सातारा उत्तर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. १९६७ मध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या तिकिटावर बीड मतदारसंघातून निवडून आले. शेकाप व कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून नानांनी बहुजन समाजाच्या व शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. संसदेत मराठीतून भाषण करणारे ते पहिले खासदार होते.

आज नानांचे कार्य बहुजन समाजाने समजून घेणे गरजेचे आहे. नानांच्या कार्याचे खरे मूल्यमापन झाल्याशिवाय त्यांच्या कार्याचे चीज होणार नाही. कथा, कादंबऱ्या, चित्रपट अशा अनेक माध्यमातून नानांचे कार्य उपेक्षित राहिले आहे. नानांच्या जीवनावर, कार्यावर यापुढे अधिकाधिक साहित्यनिर्मिती करणे हीच क्रांतीसिहांना खरी आदरांजली ठरेल.

Monday 26 March 2012

मराठा व कुणबी ह्या दोन भिन्न जाती नसून एकच आहे

मराठा समाज कुणबी असल्याचे पुरावेमराठा समाज कुणबी असल्याचे असंख्य पुरावे देता येतील. वास्तविक पाहता मराठा व कुणबी या दोन्ही भिन्न जाती नसून एकच आहे. (सन १८८१ पासून १९३१ पर्यंतच्या ५० वर्षाच्या गॅझेट मध्ये मराठा कुणबी असल्याचा उल्लेख केला जातो) पुरावा १ :- १९८१ च्या जनगणनेत मराठ्यांचा कुणब्यांमध्ये समावेश केला होता. संदर्भ :- Bombay Gazetter Satara, Vol. XIX, Page 75, Marathas are found all over the district. The 1981 Census includes them under "Kunbi" from whom they do not forma separate caste. पुरावा २ :- मराठा व कुणबी यांचा समावेश कुणबीह्या शब्दात होतो. या दोघांमध्ये भेद दर्शविणे कठीण आहे. या दोघांमध्ये परस्पर रोटी व बेटी व्यवहार चालतो. त्यांचे रूप, रंग,धर्म कर्म, रीती रिवाज यात काही फरक नाही. संदर्भ :- Bombay Gazeteer, Poona Vol. XVIII, Part-I. The term kunbi includes two main classes "Kunbis" and "Marathe" between whom it is difficult to draw a line. Maratha and Kunbi eat together, intermarry and do not differ in appearance, religion and caste. पुरावा ३ :- "मराठा" व "कुणबी" यांच्यातील लग्न वैध असल्याचा व मराठा व कुणबी एकच असल्याबद्दल कोर्टाचा निकाल. संदर्भ :- Civil Suit No. 2 of 1920 decided on 25-10-1921 to judgement Maratha caste is genus while Kunbi caste is in species and that marriage between Maratha and Kunbi are Kunbi and perfectly valid in law. पुरावा ४ :- Gazetter of India M.S. Parbhani Dist. Page 103 : No Permanent division between Kunbi and Maratha, वर उल्लेख केलेल्या पुराव्यावरून हे सिद्ध होते की, 'मराठा' व 'कुणबी' ह्या दोन भिन्न जाती नसून एकच आहे. शेती करणारे मराठा म्हणजेकुणबी.संदर्भ :- मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने दिलेला निर्णय आहे. व अमरावती कोर्टाच्या निर्णयानुसार शेती करणारा हा कुणबी हा स्पष्ट होता. शेती करणारा मराठा म्हणजेच कुणबी हे सिद्ध करणारे पुरावे पुरावा १ :- Gazetter of India, M.S. Aurangabad District Page 293. The Kunbis from the main body of agricultural population the members of which by heridatary occupation are farmers and tillers of soil. पुरावा २ :- Gazetter of India, M.S. Wardha Dist. Page 148 - "Kunbi has come to be the accepted type of all Maratha cultivator" सर्व मराठा शेतकरी कुणबी आहेत. पुरावा ३ :- Gazetter of India, M.S. Wardha Dist. Page 160 - "Kunbi are regular agricultural caste of district" कुणबी ही नियमित शेती करणारी जात आहे. पुरावा ४ :- Gazetter of India, M.S. Nagpur Dist. Page - The Kunbi is traditional. The term Kunbi has become the generic name for professional cultivator. कुणबी हे परंपरागत व्यवसायाने शेतकरी आहेत. सर्व संदर्भाद्वारे हे सिद्ध होते की, शेती करणारा मराठा म्हणजेच "कुणबी" म्हणून महाराष्ट्रातील सर्व शेती करणा-या मराठ्यांना "कुणबी" या जातीने ओळखले जावे. श्री. एफ.ई. इथावेन यांनी त्यांच्या मुंबईच्या जाती व जमाती खंड-३ या पुस्तकात 'कुणबी' या नावाखाली येणा-या जातींचे विश्लेषण केले आहे ते असे. वर्ग-१ :- मराठा कुणबी - शेती करणारे मराठा यांचा समावेश या वर्गात होतो. यांनाच कुळवाडी असे म्हणतात. वर्ग-२ :- इतर मराठा - यात गवंडी, कुंभार, सुतार, परीट यांचा समावेश होतो. पुरावा :- Imperial Gazetter of India (New edition) Volume XVI. "Maharashtra is country of Maratha who form 55 percent of its population. The term Maratha is not reserved for the old fighting stock a hardy and various class once the terror of India now merged very largly in the cultivating class known as kunbi". कुणब्यांनाच मराठा म्हटलेले जाते असा पुरावा पुरावा :- तत्कालीन हैद्राबाद संस्थानाने प्रसिद्ध केलेले गॅझेटीअर The term Maratha is now applied principallyto the are Kunbis. It should be unframed to the military family of the countries. The Kunbis from main body of the cultivator population. पुरावा :- जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती समाज कल्याण, म.रा. पुणे यांनी त्यांच्या क्र.जा.प्र.क्र./अपील क्र. ४/९६/कांताबाई इंगोले ९६-९७/का-२०६३ पुणे, दिनांक १६-१२-९६ वक्र.जा.प्र.प./ अपील क्र. १०/९६/ बा.द.पाटील/९६-९७/का-२०४२, पुणे दि. ०९-१२-९६. या दोन्ही निर्णयात शेती करणारा मराठा म्हणजे कुणबी असा निर्णय दिला आहे. हा निर्णय सर्वांसाठी लागू करावा. म्हणून "कुणबी व मराठा" एकच असल्याबद्दलचे वर उल्लेख केलेले इतर आणखी पुरावे सापडतील. तसेच शेती करणारा 'मराठा' म्हणजेच 'कुणबी' या जातीचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी मराठा सेवा संघ प्रयत्नरत आहे. ह्याच आधारावर महाराष्ट्रात मराठ्यांना सरसकट कुणबी संबोधून शासनाच्या ओ.बी.सी. मध्ये लागू असलेल्या सर्व शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय इत्यादी सवलती त्वरीत द्याव्यात.

शिवाजी जन्माला येण्यासाठी आधी आम्हाला जिजाऊ घडवावी लागेल

आई जिजाऊ जिजाऊ.....स्वराज्याची प्रेरणा......जगातील प्रत्येक माणसाने आदराने नतमस्तक व्हावे अशी व्यक्ती. प्रत्येक पराक्रमी पुरुषाच्या जीवनाचे ध्येय एकच असते, जे पारतंत्र्यात असतात, त्यांना स्वातंत्र्य मिळवून देणे, ही जिजाऊनी शिवरायांना दिलेली शिकवण होती. आणि त्यासोबत आपण- समाज, तू आणि मीही - पारतंत्र्यात आहोत, ही दिलेली जाणीव होती. छ. शिवरायांनी स्वराज्याची स्थापना करून मावळ्यांच्या मनात स्वाभिमान निर्माण केला. हे आपले राज्य आहे, आणि आपण त्यासाठी लढले पाहिजे हा आत्मविश्वास निर्माण केला. आज आपण म्हणतो घराघरात शिवाजी जन्माला यावे, पण शिवाजी जन्माला येण्यासाठी आधी आम्हाला जिजाऊ घडवावी लागेल हे मात्र सोईस्करपणे विसरून जातो. जिजाऊनी शिवबावर संस्कार केले, शिवबा घडवलेआणि स्वराज्याचे रणशिंग फुंकले. बलाढ्य आदिलशाही, निजामशाही, मुघल या सत्तांना न जुमानता जिजाऊनी शिवबाला लढायला प्रोत्साहन दिले. शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत स्वराज्याचे रक्षण केले. जिजाऊ या स्वत शिकलेल्या होत्या. अक्षरज्ञानाबरोबर घोडयावर बसने, दांडपट्टाचालवणे, तलवारबाजी ई. चे प्रशिक्षण जिजाऊनी घेतले होते. जिजाऊ या अत्यंत संयमी आणि करारी स्वभावाच्या होत्या. गोरगरीबाप्रती आपुलकी आणि दुष्टांना शासन अशा प्रकारचा त्यांचा स्वभाव होता. तसेच संस्कार त्यांनीशिवाबावर केले. छ. संभाजीरांवर केले. त्यामुळेच पुढे संभाजी राजांनी शृंगारपुर चे सुभेदार असताना दुष्काळग्रस्त प्रज्येकडून एक वर्ष शेतसारा वसूल न करण्याचा निर्णय घेतला. (तेव्हा संभाजी राजांच्या या उदारपणांचे कौतुक करायचे सोडून ते अकार्यक्षम मंत्री आहेत अशी ओरड त्यांच्या अष्टप्रधान मंडळातील नतद्रष्टांनी सुरु केली होती.) संभाजी राजांचे हे वर्तन म्हणजे जिजाऊच्या संस्काराचाच परिणाम नव्हे काय ? छ. शिवरायांनी स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्या रांझ्याच्या पाटलाला कडक शिक्षा दिली. स्त्री ही मराठ्यांच्या देव्हाऱ्यातील देवता होय हा संस्कार जिजाऊनी शिवबा आणि शंभूराजांवर केला. जिजाऊनी जे संस्कार आपल्या मुलावर आणि नातवावर केले त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही. त्या संस्कारामुळेच आज या दोन छत्रपतींची नावे घेतली कि आपण आपोआप नतमस्तक होतो. प्रत्येक आईने जर जिजाऊ सारखी भूमिका घेवून अन्याय, विषमता, जातीव्यवस्था याविरुद्ध लढणारे “शिवाजी” निर्माण केले तर पुढील काळात समाजात निश्चितच चांगले चित्र पाहायला मिळेल. आणि मला वाटते हीच जिजाऊ ना खरी आदरांजली ठरेल. जिजाऊच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी पुणे वसवले. आज जरी इतिहासकार पुणे वसवण्याचे श्रेय दादोजी कोंडदेव यांना देत असले तरी त्या कार्याचे खरे श्रेय जिजाऊ चे आहे. त्यामुळे पुणे आणि जिजाऊ यांचे एक अतूट नाते आहे. त्यामुळे जिजाऊचे नाव पुण्याला देण्यात यावे अशी सर्व जिजाऊभक्तांची मागणी आहे. - prakash pol www.sahyadribana.com

Sunday 25 March 2012

बहुजनांचा राजा : छत्रपती शाहू महाराज

आरक्षण सुरू करणारे छ. शाहू महाराज यांना गोरगरिबांच्याविषयी फारच कळवळा वाटत असे. म्हणून माणगांवच्या परिषदेत 1920 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना गोर-गरिब, दीनदलित, बहुजनांचे नेते घोषित केले व म्हणाले, `आता मला काळजी करण्याचे कारण नाही. कारण आता बहुजनांचा उद्धारक, गोरगरिबांचा उद्धारक आपल्या सर्वांच्या समोर आहे. डॉ. बाबासाहेबांच्या रूपात मला तो दिसत आहे. असे बोलून बाबासाहेबांचा जयघोष केला. गोरगरिबांचा उद्धार-विकास व्हावा, या उद्देशाने शाहू महाराजांनी आपल्या दरबारात त्यांना स्थान दिले. त्यांच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून त्यांना कामे दिली. जे गोरगरिब कर्तबगार होते. ज्यांनी ज्यांनी विशेष असे नैपुण्य, कलाकुसर दाखवित होते. शाहू महाराज अशा लोकांना बक्षीस म्हणून कुणाला जमीन, तर कुणाला फेटे बक्षीस देत असे. हे उच्चवर्णीयांना आवडत नसे. काही उच्चवर्णीयांनी छ. शाहू महाराजांना सांगण्याचा देखील प्रयत्न केला. की `महाराज तुमच्याच सारखा फेटा या सिद्धु महाराने घातला आहे. तेव्हा महाराज म्हणाले, `त्या सिद्धुला माझ्यासमोर उभा करा.' तेव्हा तो सिद्धू महार लपून बसला होता. त्याला पकडले व महाराजांच्या समोर उभा केले. महाराजांनी त्याला पाहिले. तो घाबरलेल्या मनस्थितीत होता. म्हणून त्याला महाराज म्हणाले, `अरे! तूमर्दासारखा मर्द गडी. अन् घाबरतोस कशाला? अरे! तुला फेटा कसा दिसतो तो पाहण्यासाठी बोलावले आहे. तुला माझ्यापेक्षाही सुंदर दिसतो फेटा.' असे म्हणत त्याला बक्षीस म्हणूनजरीचा फेटा व जमिनीचा तुकडा दिला. तो आनंदानेउड्या मारत घरी गेला. अशाप्रकारे कोल्हापूर नगरीचे बरेच लोक फेटा बांधायला लागले. अनेक कलाकार त्यांच्या दरबारी होते. पैलवानांमध्ये गोपाळ, परीट, कसबेकर, गामा, शिंदे, माने, गणपत शिंदे, कलाकारांमध्ये आबालाल रहिमान चित्रकार, बाबूराव पेंटर, गम्यक, शंकरराव सरनाईक बालगंधर्व, केशवराव भोसले, कलावंतांमध्ये केसरीबाई अंजनीबाई मापलेकर, आल्लादियाँ खाँ, गोविंद टेबे, आनंद पेंटर, दळवी आर्टिस्ट, बाबा गजबकर माधवराव बागल अशापकारे अनेक कलाकुसरीमध्ये नाविन्य मिळविलेले अनेक कलावंत त्यांच्या दरबारी आश्रयाला होते.जातीयता नष्ट व्हावी, म्हणून भारतातील पहिले हरिजन हॉटेल, त्याचे नावं `सत्य सुधारक हॉटेल' गंगाराम कांबळे त्या हॉटेलचे मालक, शाहू महाराज टांग्याने या हॉटेलात जात व भजी, चहा, कॉफी खातपित असतं. अशाप्रकार शाहू महाराजांनी जातीयता मोडीत काढली, पण उच्चवर्णियांच्या मनातील जातीयता तशीच राहिली, मिलिट्रीमध्ये किंवा अन्य सेवामध्ये विशेष असे कार्य केलेल्या जवानांना छ. शाहू महाराजांनी जमिनी दान दिल्या आहेत. गोरगरिबांच्या जनावरांच्या चाऱयासाठी, गायरान कुरणे दान केली आहेत. गोरगरिब विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह बांधून दिली आहेत. मुसलमान विद्यार्थ्यांसाठी मुसलमान वस्तीगृह बांधून दिले आहेत. जैन विद्यार्थ्यांच्या सुद्धा वस्तीगृह बांधून दिले आहेत. अनेक गोरगरिबांच्यासाठी आश्रम शाळा बांधून दिल्या आहेत. अनाथ आश्रम शाळा अनेक ठिकाणी उभारल्या आहेत. डॉ. बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी सुद्धा शाहू महाराजांनी मदत केली आहे. अनेक शिक्षण संस्था उभारल्या आहेत व त्या शिक्षण संस्थांमधून अनेक गोरगरिब विद्यार्थ्यांनी आपले जीवन सुधारले आहेत. 30 जून, 1974 रोजी महाराष्ट्रामध्ये जन्मशताब्दी महोत्सव साजरा झाला तेव्हा महाराष्ट्र शासनातर्फे शाहू महाराजांच्या विशाल कार्यांचे दर्शन घडविणाऱया राजर्षी शाहू महाराज गौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. जन्मशताब्दी महोत्सवापासून अनेक व्यक्तींनी, संस्थांनी व अनेक वृत्तपत्रांनी व राजकीय पक्षांनी महाराजांच्या नावे टपालतिकीट निघावे म्हणूनप्रयत्न करून भारत सरकारच्यावतीने टपाल तिकिट काढून त्यांचा सन्मान केला. राष्ट्रपुरूषांच्या मालिकेत शाहू महाराजांना आढळत असे स्थान प्राप्त झाले.शाहू महाराजांच्या जन्म शताब्दी निमित्ताने त्यांचे एक कायम स्वरूपी स्मारक उभे करण्याचे ठरले. त्या दृष्टीने `राजर्षी शाहू मेनोरियल ट्रस्ट' या धर्मादायी संस्थेने त्यावेळचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली. या संस्थेमार्फत एक विश्वस्त निधी उभारला गेला आणि या निधीतून `राजर्षी शाहू स्मारक भवन' या नावाची भव्य व सुंदर वास्तू उभी करुन त्यांच्या स्मृतीचे जतन करण्यात आले आहे. या निधड्या छातीच्या राजांची आठवण आली की कोल्हापूरचा जुना राजवाडा आठवतो व कोल्हापुरात शाहू महाराजांनी तयार केलेल्यापैलवानांसाठी खासबाग मैदान आठवते, गोरगरिब जनतेच्या पिण्याच्या पाण्यासाठी, शेतीसाठी राधानगरी येथे बांधलेला लक्ष्मी तलाव ज्याच्यावर विद्युत जनीत्रे बसून वीज उत्पादन केले जाते व राधानगरी वनसंवर्धन व व्याघ्रप्रकल्प आठवतो

Friday 23 March 2012

जय शिवराय

"राजे"तुमच्या नसण्याने खुप काही हरवलंय..... स्वारथ्याच्या पायी माणसाँनी ... माणुसकीपण हरवलयं, चारिञ्य स्ञीच तिनंच विकायचं ठरवलयं, निष्ठेला विकुन लोकाँनी लबाङीन मन भरवलयं, तुमच्या नसण्यानेराजे खुपकाही हरवलंय ॥ पैशाच्या बळावर श्रीमंतानी गरिबांना वाकवलंय, जन्मणार्ऱ्या प्रत्येक पिढीला त्यांनी खोटेपण शिकवलयं, अंतकरणातला देव विसरुन त्याला मंदीरात बसवलयं, तुमच्या नसण्यानेराजे खुप काही हरवलंय ॥ सत्तेच्या मोहापायी पुढार्ऱ्यांनी जातीचं साम्राज्यटिकवलंय, स्वतःहा नीचपणाचापुतळा, होऊन नियतीलाचं लाजवलंय॥ घात केलाय स्वतःच्या ईमानीचा, अनंइतिहासालाचं रडवलंय ॥ तुमच्या नसण्यानेराजे खुपकाही हरवलंय ॥ ।। जन्म घेतलांच त्यांनी स्वराज्यघडविण्यासाठी ।। ।।अरे दिल्लीचेहीतख्त व्याकुळ शिवरायांच्या दर्शनासाठी ।।

Wednesday 21 March 2012

|| जिजाऊ तुम्ही होत्या म्हणून ||

जिजाऊ तुम्ही होत्या म्हणून झळकले मंदिराचे कळस जिजाऊ तुम्ही होत्या म्हणून दिसले सुहासिनिंच्या कुंकू भाळी जिजाऊ तुम्ही होत्या म्हणून पतीव्रतांच्या किंकाळ्या विरल्या नाहीत रानोमाळी || १|| जिजाऊ तुम्ही होत्या म्हणून दिसले स्वप्न स्वराज्याचे जिजाऊ तुम्ही होत्या म्हणून फुलले कर्तुत्व शिवरायांचे जिजाऊतुम्ही होत्या म्हणून विझली सतीच्या सरणाची आग जिजाऊ तुम्ही होत्या म्हणून मुर्दाड मनाला आली जाग || २ || जिजाऊ तुम्ही होत्या म्हणून झाली अन्याय,अत्याचार ाची अधोगती जिजाऊ तुम्ही होत्या म्हणून स्वराज्याला मिळाले दोन दोन छत्रपती जिजाऊ तुम्ही होत्या म्हणून पिलांना क्रांतीचे पंख फुटलेजिजाऊ तुम्ही होत्या म्हणून भटशाहीचे बुरुज तुटले || ३ || जिजाऊ तुम्ही होत्या म्हणून शिवबा सार्वभौम छत्रपती बनलेजिजाऊ तुमच्याच हयातीत रयतप्रिय राजाला भटांनी शुद्रात गणले जिजाऊ तुम्ही सल अपमानाची काळजात ठेवून पाचाडी विसावल्यातेव्हाविव्हळल्य ामनानंदुखाश्रू ढाळत होत्या रायगडच्यासावल्या || ४ || जिजाऊ तुम्ही होत्या म्हणूनचलढला मावळा जगला महाराष्ट्र आणि तगला मानव धर्म जिजाऊ तुम्ही होत्या म्हणून पेटून उठला आज मराठा आणि प्रगटला घराघरातून शिवधर्म. ॥जय जिजाऊ॥ ॥जय शिवराय॥

Tuesday 20 March 2012

॥जिजाऊसाहेब॥

तूम्ही नसता तर नसती दिसली अंगणी तूळस........... .... तूम्ही नसता तर नसती दिसली मंदिराचे कळस............ .... तूम्ही नसता तर नसते भरले पाणवठ्यावर पाणी............. तूम्ही नसता तर सुवासिनिँच्या किँकाळ्या मग विरल्या असत्या रानी........... ............... .

Saturday 17 March 2012

VBVP Kolhapur.: वीर भगत सिंह

VBVP Kolhapur.: वीर भगत सिंह: हे वीर भगत सिंह, बहुत हुआ मेरा धैर्य, बहुत हो चुकी तुम्हारी शान्ति, आओ हम तुम मिलकर शुरू करे एक नई क्रान्ति, एक नई क्रान्ति..... जब निर्दय...

Tuesday 13 March 2012

नेताजी सुभाष चंद्र बोस आणि भगतसिंग यांचे आदर्श होते छत्रपती शिवराय ....

नेताजी सुभाष चंद्र बोस आणि भगतसिंग यांचे आदर्श होते छत्रपती शिवराय .... इतिहासकारांनी या बाबी पद्धतशीरपणे लपवून ठेवल्या ....१९३९ मध्ये रायगडावर जावून सुभाषबाबू शिवरायांसमोर नतमस्तक झाले होते .भगतसिंग तर शिवरायांचा मर्द मराठा असा उल्लेख करत . छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श वीरपुरुष म्हणून मानत असत. महाराष्ट्राच्या लढाऊ स्वातंत्र्यप्रे माविषयी त्यांना मोठा आदर होता. भगतसिंग 1924 मध्ये महाराष्ट्रात आले असता ते रायगडावर गेले आणि तेथील माती मस्तकाला लावून त्यांनी देशस्वातंत्र्या ंची प्रतिज्ञा शिवरायांच्या नावाने पुनरुच्चारित केली....इतिहासा त या घटनांचा जाणीवपूर्वक उल्लेख केला जात नाही , हे खऱ्याशिवप्रेमींनी लक्षात घेतले पाहिजे ..... - DrSandeep Patil

Tuesday 6 March 2012

॥भगतसिंगचे क्रातीकारक विचार॥

''लहान मूलानां इश्वर शक्तिमान आहे असे सतत सांगने म्हणजे मूलांना कायमस्वरुपी कमजोर करते''

''बुध्दीमान माणसं ज्याना वेडी पोर म्हणतात,
वाट चुकलेले म्हणतात तेच क्रांत्या करत असतात''

''उद्दिष्टसाठी मरण नव्हे तर उद्दिष्टसाठी जगने आणि ते देखील लाभदायक होईल अशा योग्य पद्धतीने जगने हा सर्वाँसाठी प्रेरणादायी आदर्श सायला हवा''


-
वीर भगतसिंह

Sunday 4 March 2012

Purushottam Khedekar – the man behind Maratha awakening.

By Mushtaque Madni
Pune: “Muslims have no reason to feel guilty. Brahmins have plenty to feel guilty about. It were Brahmins who humiliated, harassed and conspired against Shivaji and finally killedhim in the most mysterious manner,” says Purushottam Khedekar, founder of Shiv Dharma and a strong Maratha revolutionary.
During the last twenty five years, Khedekar (62), a civil engineer and a law graduate, has emerged as a potential threat to the Brahminical superiority which was an accepted and established fact even among Marathas. Not only he formed a separate religion (Shiv Dharma), courageously rebellingagainst the old order of ‘Manu’ but also established a strong organization called ‘Maratha Seva Dal’ to counter Brahmanism in all forms and colours. He went on to challenge their superiority and even questioned their patriotism and, more importantly, exposed their malicious intents and misdeeds against Maratha King Shivaji Raje Bhonsle, popularly known as ‘Shivraya’ inMaharashtra.
It was just few years back that at the time of Shiv Jayanti in Maharashtra, Muslims used to be the most scared lot, for it was taken for granted that howsoever Police stood alert and impartial, riot against Muslims was an integral part of the procession and an inevitable necessity. The fear was so compounded that some Muslims sent their families to their relatives in neighboring citiesor states. Afzal Khan and Shaista Khan were identified as the “symbols” of Muslim brutalityand Shivaji as the Maratha saviour who fought against the Muslim rulers. This was nothing but a typical Brahmin ploy to mislead Marathas and trick them into fighting Muslims. It was Khedekar and his committed disciples who instilled confidence among Muslims that they have no reason to feel guilty as Muslims constituted nearly 40 percent of Shivaji’sarmy and that Muslims were the most trusted allies and friends of Shivaji after Marathas. On the contrary, it were Brahmins who were the committed friends of Afzal Khan and deadliest enemies of Shivaji.
Again, it was Khedekar and his Maratha brigade that enlightened Muslims about the enormous support extended at times of crisisby Usman Shaikh and his sister Fatima Bi to Mahatma Jyotiba Phule and his wife Savitri BaiPhule, when they started educational awakening among Marathas, an unheard of thing during those days among non-Brahmins who were not supposed to get educated.
Inspired by the early visionaries of the Bahujan Samaj of the likes of Mahatma Jyotiba Phule, Shahu Maharaj of Kolhapur and Dr. Baba Saheb Ambedkar who exposed and fought against the Brahminical tyranny in every sphere of life, Khedekar says “Muslims should confidently come forward to claim their rights on these visionaries, for they were the ones who stood firmly with these towering figures when they were harassed and marginalized by the Brahmins.”
Khedekar is critical of Muslims for not visualizing the great social change that is in the offing and that is going to benefit all including Muslims. “If Jyotiba wrote ‘Brahmananche Kasab’ (How to cut down Brahminism) and Ambedkar publically burnt Manusmiriti that preaches hatred and discrimination even within the Hindu community, it was to unite all Bahujans, irrespective of their religions, including Muslims, against Brahminical tyranny.
One of the most remarkable achievements of Khedekar was that he diagnosed and workedsimultaneously on all grounds that were ailing Bahujans. He discovered that every single mischief and atrocity that culminated in attacks on Muslims was actually aimed at Bahujans, for Brahmins wanted to keep youthful Marathas constantly engaged in baseless conflicts and confrontations and consequently away from development and leading a decent life.

Friday 2 March 2012

भरमसाठ वॅकेशन फिसविरुद्ध महामोर्चा

VBVP लातुरच्या वतिने भरमसाठ वॅकेशन फिसविरुद्ध महामोर्चा काढला.महात्मा बसवेश्वर कॉलेज ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत प्रंचंड विद्यार्थि पालक कार्यकर्त्यांच् या उपस्थितीत कलेक्टर लातुर यांना निवेदन दिले !
यावेळी शिवाजि सावंत
(जिल्हाध्यक्ष) मोर्चाचे नेत्रुत्व केले..जय जिजाऊ !

Thursday 1 March 2012

॥इडा पीडा टळो शिवरायांचे शिवराज्य येवो॥

जेव्हा या भारतात शिवरायांच शिवराज्य येणार तेव्हाच या भारतातील श्रमकरी शेतकरी सुखी होणार

।ज्या देशातील शेतकरी प्रगत तो देश प्रगत।


॥इडा पीडा टळो
शिवरायांचे शिवराज्य येवो॥