Wednesday 21 November 2012

शिवधर्मीय मागणं

हे जिजाऊ! आदि माये ! महामाये !! आम्ही सर्व तुझी लेकरें तुला कृतज्ञतापूर्वक वंदन करतो कळीकाळाचा अंधार झिडकारुन समृध्द शिवमार्गावरुन जाण्याचं अचाट धैर्य तुझ्याच मुळ मिळालं मिळालं मुळ जगण्याचं, जगू देण्याचं चिरंतन ज्ञान.......... ..
प्रकटला अज्ञानाचा नाश करणारा शिवधर्मी ऊर्जास्त्रोत तुझ्याच मुळं निर्भय होऊन पिढ्या न् पिढ्यांचे गुलामीचे पाश झुगारण्याचं बळही हे माते !
 सृष्टीचे सृजनाचं रूप तू निर्मिकाच्या दृष्टीचं स्वरूप तू जगणा-या जिवाला श्वास दे ! शिवधर्माचा ध्यास दे !!
पळू दे दु:खाची सावटे जळू दे विकारांची पुटे उगवू दे ऐक्याचे ,समतेचे बीजांकूर येऊ दे समृध्दीचे सर्वत्र महापूर श्रमाला बळ दे,कष्टाला फळ दे !
इडापीडा जाऊ दे, बळीचे राज्य येऊ दे !!
बळीचे राज्य येऊ दे
!! जय जिजाऊ !!

Monday 22 October 2012

sambhaji brigade

मराठा सेवा संघ ही आता एक व्यवस्था झाली आहे - पुरुषोत्तमजी खेडेकर.


जळगाव (दि. 15 जुलै ) - 'मराठा सेवा संघाच्या 21 वर्षाच्या कालावधीत पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केलेल्या कार्याच्या जोरावर मराठा सेवा संघ हि आता संघटना राहिली नसून ती व्यवस्था झाली आहे' अशी भूमिका युगपुरुष पुरुषोत्तमजी खेडेकर यांनी जळगाव येथे झालेल्या मराठा सेवा संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत उपस्थित पदाधिकार्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केली. या प्रसंगी विचारपीठावर मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष इंजि. शिरीष जाधव, कार्याध्यक्ष कामाजी पवार , प्रदेश सचिव मधुकर मेह्करे आदी मान्यवर उपस्थित होते. पदाधिकार्यांना मार्गदर्शन करताना खेडेकर साहेब पुढे म्हणाले कि, महामानवांनी प्रचंड कार्य केले. परंतु ते व्यवस्था निर्माण करू शकले नाही. याचा कार्यकर्त्यांनी गांभीर्याने विचार करावा. मराठा सेवा संघ हि केवळ इंजिनिअर किंवा कर्मचार्यांचे हित जोपासण्यासाठी निर्माण केलेली संघटना नाही तर कर्मचार्यांनि एकत्र येवून समाजाच्या प्रगतीसाठी कार्य हि अपेक्षा आहे. कोणत्याही संघटनेत सेवा करताना मेवा घेणाऱ्यांची संख्या असतेच अशा लोकांनी मेव्याचा काही भाग तरी संघटनेला दिलाच पाहिजे, पुण्यात तुमचा नातेवाईक अडचणीत आला तर आम्हाला फोन करता परंतु हा नातेवाईक मराठा सेवा संघाच्या कार्यक्रमात का दिसत नाही हि हरामखोरी आहे. संघटनेत शाशकीय पातळीसारखी यंत्रणा राबवता आली पाहिजे गावात एक तरी संघटनेचा प्रतिनिधी असावा. प्रत्येक पदाधिकार्यांना सदस्य म्हणून बोलता आले पाहिजे. त्यासाठी फक्त काम करण्याची हौस असल्याबरोबरच निष्टा व झोकून देण्याची वृत्ती हवी. पदाधिकारी हा मांजरी सारखा असावा कसेही फेकले तरी चार पायावर त्याला राहता यावे. पदाधिकार्यांनी एखादा तरी छंद असा जोपासावा कि त्या क्षेत्रातील काहीही प्रश्न निर्माण झाला तर तुमच्याशीच संपर्क साधला जावा. मराठा सेवा संघात सध्या जी शिथिलता निर्माण झाली आहे. त्याचे कारण असे तर नाही कि गुरुत्वाकर्षण शक्तीचा एक नियम आहे एखादी वरफेकलेली वस्तू एका उंचीवर जावून खालीच येते असे होवू नये. मराठा सेवा संघ कोणाही पदाधिकाऱ्यांची खासगी प्रॉपरटी न होता नवीन कार्यकर्ते संघटनेत आले पाहिजे त्यासाठी प्रोग्राम हवा . कोणतीही चळवळ यशस्वी व्हायची असेल तर त्यास राजकीय पाठींबा हवा . त्यासाठी राज्यकर्त्यावर आपला अंकुश ठेवता आला पाहिजे . परंतु आपण सामाजिकदृष्ट्या पन्नास हजार लोक एकत्र आणू शकतो परंतु त्यातील 50 लोकही आपण मतदानाच्या दृष्टीने परावर्तीत करू शकत नाहीत यावर गांभीर्याने विचार करा . आपण बदलत नाही तेच तेच लेख, तीच तीच भाषणे किती दिवस करणार ? हा प्रश्न उपस्थित करून खेडेकर साहेब यांनी नवीन कार्यक्रम लावण्याचे आवाहन केले . त्याचे उदाहरण देताना ते म्हणाले कि सध्या राजकुमार तांगडेयांचे 'शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला' हे नाटक पाहण्यासारखे आहे याचे किमान 10 प्रयोग तरी मराठा सेवा संघाच्या वतीने लावा . मराठ सेवा संघाच्या कार्यकर्त्यांना शोधून चहापानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करा . PDSP व वीर भगतसिंहविध्यार्थी परिषद ( VBVP ) या संघटनांनी टायलेंट शोधून काढावेत . आपले खरे कार्यकर्ते छोट्या पेपरचे वाचक आहेत . त्यामुळे अशा छोट्या पेपरला बातम्या , लेख द्या . कार्यकर्त्यांनी पैसे खर्चायला जसे आवडते तसे जमा करता आले पाहिजे . कार्यकर्ता सतत फिरता हवा सध्या ब्रिगेडीयर सुधीर सावंतमहाराष्ट्रभर रात्रंदिवस फिरत असून त्यानंतर प्रदीप सोळुंकेचा नंबर लागतो . यांचा आदर्श घ्या . सिंदखेडराजा येथील पाण्याचा प्रश्न इंजि. चंद्रशेखर शिखरे यांच्या प्रयत्नाने सुटला आहे . आपले अनेक पदाधिकारी संघटनेत काम करताना घराकडे दुर्लक्ष करतात आपले कुटुंब नातेवाईक समाजात येत नाहीत काय ? असा प्रश्न विचारून खेडेकर साहेब यांनी सर्वाना कुटुंब नातेवाईकांकडे लक्ष देण्याचे आश्वासन केले .या प्रसंगी शिवराज्यपार्टीच े प्रदेशाध्यक्ष ब्रिगेडीअर सुधीर सावंत , जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष वासंती नलावडे , वीर भगतसिंह विध्यार्थी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप सोळुंके , पंजाबराव देशमुख शिक्षक परीशधेचे प्रदेशाध्यक्ष पप्पू पाटील भोईर , संभाजी ब्रिगेड चे महासचिव मनोज आखरे , वधूवर सूचक कक्षाचे प्रदेशाध्यक्ष बी.टी. देवरे , जगन सरकटे व सर्व पदाधिकारी उपस्थित होते .

Sunday 9 September 2012

विचारांचा जागर: शेंडी जाळो अभियान

विचारांचा जागर: शेंडी जाळो अभियान: शेंडी जाळो अभियान.                                    होय.. होय... होय...! अगदी योग्य वाचले तुम्ही.... जे वाचायला हवं, नव्हे तर...

Friday 24 August 2012

V.B.V.P.विद्यार्थांना दिशा देणारी संघटना


भारत  - जगातील सर्वात मोठा लोकशाही प्रधान देश.
- जगात लोकसंख्येत दोन नंबरचा देश.
- अनेक परकीय आक्रमणे पाहिलेले, आक्रमणे पचवलेला देश.
- एकेकाळी स्वयंपूर्ण खेडी असलेला देश.
- एकेकाळी टाचणी न तयार होणारा व आज उपग्रह तयार करणारा देश .
- सर्व जगाला मजूर, तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ पुरविणारा देश.
- क्रिकेटमध्ये 'वर्ल्डकप' जिंकणारा देश.
- इ.स.२०२० ला जागतिक महासत्ता होण्याचे स्वप्न पाहणारा देश.
दुसरी बाजू - शेतकर्यांच्या आत्महत्या होणारा देश.
- धार्मिक, जातीय दंगली करणारा देश.
- कर्मकांडात अडकलेला देश.
- तरुणांच्या हाताला काम व बुद्धीला दिशा न मिळालेला देश.
- ऑलीम्पिक २०१२ लंडन मध्ये एकही सुवर्ण पदक न मिळालेला देश.
- स्त्री अर्भकांचा गर्भपात करणारांचा देश.
         भारत इ.स. २०२० ला महासत्ता होणार अशी चर्चा सध्या भारतामध्ये विद्वान व प्रचार प्रसार माध्यमे करत आहेत. इ.स. २०२० यायला अजून आठ वर्षे बाकी आहेत. या आठ वर्षात भारत महासत्ता होणार म्हणजे नेमके काय होणार? हे ज्यांच्या सामर्थ्यावर भारत देश महासत्ता बनवायचा त्या तरुणांनाच नेमके कळलेले नाही. भारत महासत्ता बनणार म्हणजे नेमके काय? आम्ही सैनिकी हल्ले करून सर्व जग ताब्यात घेणार ? आमच्या भारतीय कंपन्या इतर देशात जाऊन सर्व व्यापार ताब्यात घेणार? नेमके काय करणार? हेच भारतीय तरुणांना नेमके माहित नाही. बर्याच तरुणांना तर तालुका, जिल्हा, राज्य, देश, खंड यातील फरकही निट कळत नाही. मग भारत महासत्ता होणार कसा? बरे क्रिकेट सारखी महासत्ता होण्याची काही स्पर्धा आहे का? म्हणजे अंतिम सामना फिक्सिंग करून जिंकावा व भारताला महासत्ता बनवावे अशी काही तरतूदही नाही. या देशातील तरुणांना महासत्ता होणे म्हणजे काय? हेच अजून माहित नाही आणि आम्ही भारताला महासत्ता बनविण्याचे स्वप्न पाहत आहोत.
         स्वप्न पाहणे गुन्हा नाही. स्वप्न पाहण्याला ट्याक्सहि नाही. मोठी स्वप्ने अवश्य पहावितच परंतु या स्वप्नपूर्ती साठी नियोजन नावाचा काही भाग असतो. त्या नियोजनाची अंमलबजावणी व्हावी लागते. या अंमलबजावनीला प्रतिसाद मिळावा लागतो त्यासाठी अहोरात्र कष्ट करून झोकून देणारी माणस निर्माण करावी लागतात नव्हे अशी मानस निर्माण व्हावी लागतात तरच या स्वप्नांची पूर्तता होत असते. मला सांगा भारत महासत्ता बनविण्याचे कोणते प्रयत्न या देशात होत आहेत? ज्या देशात मुलगी नको वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा असा हट्ट धरला जातो . बरे मुलगा झाल्यावर त्याला दिशा देण्याचा त्याच्यावर काही संस्कार करण्याचा प्रयत्न पालक करत आहेत काय? माझे तर असे मत आहे कि घरात जसे कुकर, फ्यान, मिक्सर, ग्यास, फ्रीज असावे तसा मुलगाही असावा अशी आमच्या समाजाची मनोवृत्ती आहे. मुलगा होत नसेल तर बाराभानगडी करून पाण्यासारखा खर्च करतील, पैसे नसतील तर कर्जबाजारी होतील पण मुलगा होण्यासाठी गंड्या दोर्यापासून टेक्सट्यूब बेबीपर्यंत प्रयत्न करतील. मुलगा झाल्यावर प्रचंड खर्च करून वाढदिवस  साजरा करतील परंतु त्या मुलावर शिक्षणासाठी, विविध कला शिकण्यासाठी पुन्हा खर्च करणार नाहीत. भारताला आत्ता ऑलीम्पिक मध्ये एकही सुवर्ण पदक मिळाले नाही म्हणून बोंबलनारे आपला मुलगा, मुलगी ग्राउंडवर जाणार नाही याची काळजी घेतात. बरे या मुलांसाठी मोकळी जागा राहिली कोठे? की जेथे मुलांनी जाऊन खेळावे, खेड्यात पूर्वी गायरान असायचे ते गेले. शहरात अतिक्रमणे वाढली सोसायटीच्या मोकळ्या जाग्यावर चढाओढीने मंदिरे बांधली, मुले खेळणार कोठे? एखाद्याला फारच इच्छा झाली तर त्याला क्रीडा साहित्य उपलब्ध होत नाही, झाले तर महाग. शाळेत खेळाचातास नाही, असेल तर क्रीडा शिक्षक  नाही, तो असेल तर त्यालाच खेळाची आवड नाही. खेळाडू घडणार कसे? गजगे, गोट्या, लंगडी,हुतुतू,सूरपारंभ्या, लगोरचे आमचे हे खेळ आंतरराष्ट्रीय नाहीत व आंतरराष्ट्रीय खेळ आम्हाला येत नाहीत. सुवर्ण पदक मिळणार कसे?
              अजूनही आमच्या देशातील तरुणांना देशावर प्रेम करणे याचा अर्थ फक्त सैन्यात जाऊन हातात बंदूक घेऊन सीमेवर उभे राहणे म्हणजे देशप्रेम समजतात. या देशाला खेळात सुवर्ण पदक मिळवून देणे, शेतीतील उत्पन्न वाढविणे, उद्योगधंद्याची प्रगती करणे, नवीन नवीन तंत्रज्ञान निर्माण करणे, धरणे बांधणे, कालवे काढणे, सैन्यात भरती होणे, मोठमोठ्या इमारती उभारणे, रस्ते बांधणे, रेल्वे जाले निर्माण करणे, प्रत्येक जिल्हा हवाई मार्गाने जोडणे, विध्यार्त्याना शिकविणे, विज्ञाननिष्ठ अभ्यासक्रम निर्माण करणे, इच्छाशक्ती व नजर असलेली मानस निवडून देणे, निवडून आल्यावर देशासाठी आहोरात्र काम करणे, वक्ता, लेखक, नाटककार, शाहीर, चित्रकार, पत्रकार, कीर्तनकार होऊन मनोरंजनातून जनजागृती करणे, डॉक्टर होऊन जनतेच्या आरोग्याची काळजी घेणे थोडक्यात आपण आहोत त्या क्षेत्रात झोकून देऊन काम करणे म्हणजेच देशसेवा असते. अगदी तुम्ही परदेशात जाऊन परकीय चलन देशात पाठविणे ही सुद्धा देशसेवाच आहे. त्यामुळे फक्त सैन्यात जाने म्हणजेच देशसेवा हे अगोदर तरुणांच्या डोक्यातून जाने अत्यावश्यक आहे. याचा अर्थ असा नाही की सैन्यात गेल्यावर देशसेवा होत नाही. सैन्यात गेल्यावर तर देशसेवा होतेच तसेच या देशात राहून रस्ता झाडण्यापासून मोठमोठ्या बिल्डींग बांधण्यापासून स्वयंपाकी होण्यापर्यंत कोणतेही कार्य झोकून देऊन करणे म्हणजेच देशसेवा असते. हा विचार तरुणापर्यंत गेला की भारत महासत्ता होण्यास वेळ लागणार नाही.
                भारतात अजूनही तरुणशक्ती दुर्लक्षित आहे. लहानपणापासून श्रमप्रतिष्ठा मूल्य समजाविणे अत्यावश्यक आहे मुलावर संस्कार होणे, त्यांना प्रोत्साहन मिळणे अत्यावश्यक आहे दुर्देवाने असे होत नाही. या देशातील बालकांसाठी बालसाहित्य उपलब्ध नाही. त्यांना कोणीही स्वप्न दाखवीत नाही, प्रेरणा देत नाही, लहानपणी आई म्हणते 'जन्मल्या जन्मल्या नख लावलं असते तर बरे झाले असते'. वडील म्हणतात 'वाया गेलेलं पोरग आहे'. शाळेत जावे तर शिक्षक म्हणतात 'काहीच येत नाही नालायक बस खाली'. यातून काय प्रेरणा घेणार बोला?
                या सर्वांचा अभ्यास करून मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुशोत्तमजी खेडेकर यांनी वीर भगतसिंह विध्यार्थी परिषद या मराठा सेवा संघाच्या स्वतंत्र कक्षाची निर्मिती करून या देशातील विद्यार्थ्यांना मोठी स्वप्न दाखविणे, त्यांना प्रेरणा देणे, त्याच्यातील सुप्तगुणांना हेरून त्यांची सर्वांगीण प्रगती करणे या हेतूने VBVP ची स्थापना केलेली आहे.
                आज महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यात VBVP कार्यरत असून २८ नोव्हे २०१२ ला माजलगाव जि.बीड येथे VBVP चे राज्य अधिवेशन असून नोव्हे २०१३ ला औरंगाबाद येथे राष्ट्रीय अधिवेशनाचे नियोजन सुरु आहे. महाराष्ट्रातील विध्यार्थी VBVP कडे प्रेरणा देणारी, दिशा देणारी संघटना म्हणून पाहत आहे कारण VBVP मध्ये विध्यार्त्याचा वापरा आणि फेकून द्या असा ' कडीपत्ता' होणार नाही. वकृत्व, नेतृत्व,कर्तृत्व याचे प्रशिक्षण देणारी ही संघटना असून मोठे झाल्यावर समाजाकडे 'वळून पाहणारे' नागरिक यातून निर्माण होणार आहेत.  VBVP म्हणजे जगाला गवसणी घालणारे नागरिक निर्माण करून भारत महासत्ता बनविणारे संघटन आहे.
परवा एक sms आला तो पुढील प्रमाणे 
' इस देश का क्या होगा क्योंकी 
 बुढे लोग देश चला रहे है और
 जवां लोग फेसबुक खेळ रहे है ! '
या फेसबुक खेळणाऱ्या तरुणांना देश चालविण्यास सक्षम करणे व त्यातून व्यवस्था परिवर्तन करणे हेच VBVP चे अंतिम उद्दिष्ट आहे.






                    -प्रदीप सोळुंके
                     प्रदेशाध्यक्ष
                     वीर भगतसिंह विध्यार्ती परिषद,
                     मोब. ९४२२२९५१५२

Saturday 18 August 2012

शिवधर्मसंस्कार विधी

हे सर्वच आनंद व्यक्त करण्यासाठी आहेत. हा आनंद आपापल्या सामाजिक -आर्थिक कुवतीनुसार व्यक्त व्हावा, कर्ज काढून वा उधल पट्टी करूनव्यक्त करू नये. सामुहिकतेवर भर असावा,याचा अर्थ त्याचे स्वरुप दरिद्री असावे असा घेऊ नये. 1 ) नहान संस्कार:- मुलगी वयात आल्यावर करावयाचा विधी . २) गर्भाधान संस्कार:- कुटूम्बतिल स्त्री गर्भवती झाल्याचे निश्चित झाल्यावर त्याविषयीचा आनंदसोहला साजरा करावा. गर्भवतीस सर्व प्रकारचा धीर द्यावा, तपासन्या कराव्यात. गर्भाधान सोहला गीत माऊली गे उद्याची,वांछितो ं सारयांसवे, स्वास्थ्य लाभावे निरामय तुज गडे बालासवे ध्रु कूस उगवे गे तुझी अन्,सुखविले सारयांस तू, स्पंदनांना लय दिली अन्, मोकले आकाश तू; नाद तुझिया अंतरीचा, वाहवी श्वासांसवे...स् वास्थ्य लाभावे..... माऊलीचे धन्य जीवन, अनुभाविशी तू या क्षणी, गौरवाया तुज गडे हे, शब्द अपुरे औक्षणी; दाटला आनंद आणिक ,चिंब नयनी आसवे...स्वास्थ् यलाभावे..... ३) जन्म संस्कार:- कुटूम्बात स्त्री च्या प्रसूति नंतर आई व अपत्याच्या सुदृढ़तेसाठी आनंद साजरा करून नवागताचे स्वागत करावे. नवजात बालक कर्तृत्ववा न व्हावे या भावनेने सामुहिक आनंद व्यक्त करावा. ४) नामकरण संस्कार:- जिजाऊ पूजन करून अपत्याचे नामकरण करावे व त्यानिमित्त यथाशक्ति जिव्हाल्याच्या व्यक्तींसह स्नेह मिलन सोहला साजरा करावा.अपत्याचे नाव प्रेरणादायक राहिल असे आपल्या आवडीने ठेवावे.पूर्ण नाव लिहिताना बालकाचे नाव, आईचे नाव, वड़ीलांचे नाव, आड़नाव, असे लिहावे ,शिवधर्म नावे वापरावित. ५) बाल संस्कार:- बाल संस्कार हे भावी आयुष्यातील वाटचालीसाठी दिशादर्शक असतात,बालकास जाणीवपूर्वक घड़विन्यासाठी या संस्काराची गरज आहे. ६) शिक्षण संस्कार:- मूल पहिल्यांदा शाळेत जाण्याच्या दिवशी तसेच घरातून बाहेर पड़न्या पूर्वी जिजाऊ पूजनव प्रार्थना म्हणून शाळेत पाठवावे. मूल आनंदाने शाळेत जावे. ७) समाजऋण संस्कार:- समाजामध्ये स्वतःचे सामाजिक जीवन आणि समाजाचे सामाजिक जीवन,राष्ट्र जीवन सशक्त होंन्यासाठी समता,स्वातंत्र् य,बंधुत्वाचा व्यवहार व न्याय बुद्धि ह्यांची जाणीव करवूनदेणारा सोहला आपणास आदरणीय वाटनारया कोणत्याही स्त्री-पुरुषाच् या जयंतिला कुटूम्बात करावा किंवा पुर्वजाचे स्मरण म्हणून आपल्या कुटूम्बातील व्यक्तिच्या जयंतिदिनी हा सोहला करावा व समाजप्रती कृतज्ञता व्यक्त करने. ८) सामुहिक नागरी संस्कार:- प्रत्येक शिवधर्मीय व्यक्ति ही देशाची सुबुद्ध व सशक्त नागरि क असावा यासाठी हा संस्कार आहे. राज्यघटना परिचय - नागरी परिचयकरावा. ९) आपकमाई संस्कार:- कुटुम्बातील व्यक्ति प्रथम उद्योगव्यवसाय,न ोकरी अशा पद्धतिच्या आपकमाईस जाइल त्यावेळी त्यास प्रोत्साहन मिळेल असा आनंद व्यक्त करावा . १०) विवाह संस्कार :- कुटुम्बातिल मुलीचा विवाह १८ वर्षे वय झाल्यावर करावा व मुलाचा विवाह २१ वर्षे वय झाल्यावर करावा ( याविषयी कायद्याचे पालन करावे ) विवाह संस्कारात नाते संबंध पाहने,मुला-मुली ची विविध क्षेत्रीय माहिती पाहने,मुलगा-मुल गी पाहने, पसंति, कुंकू ,साखर पुडा इतर सामाजिक सोपस्कार,प्रत्य क्ष विवाह संस्कार अशा बाबिंचा समावेश आहे ११) सामाजिक संबंध :- सामजिक व कौटूम्बीक संबंध मानवी व सहज असावेत, आपली वाटचाल, गणगोत व इतरांचा आदर करून सहजीवन जगण्याची प्रेरणा यातून मिळावी. १२) गृहप्रवेश संस्कार :- जिजाऊपूजन करून व अधिकृत प्रार्थना करून गृहप्रवेश करावा,प्रबोधन कार्यक्रम करावा, आनंद उत्सव करावा, कामगार, मजूर, कारागिराना सन्मानित करावे. १३) आनंद उत्सव संस्कार :- जीवनातील कोणत्याही आनंदाच्या प्रसंगी आनंदउत्सव साजरा करावा.याचे स्वरुप सोयीनुसार असावे, उदा. वाढदिवस, परीक्षा पास होणे, प्रमोशन होणे, व्यवसायात फायदा होणे, व्यवहारात बदल होणे, लग्नाचा वाढदिवस, परदेशप्रवास ईत्यादी १४) मृत्यु संस्कार :- शिवधर्मीय व्यक्तीला मृत्यु आल्यास खालीलपैकी एक पर्याय निवडता येईल: १) देहदान २) दाहसंस्कार ३) मृत्तिका संस्कार ( पुरने ) १५) मृत्योत्तर संस्कार :- सविस्तर विधि कार्यक्रमासाठी "शिवधर्मं भाग २ व ३" या जिजाई प्रकाशन , पुणे च्या पुस्तकांचा वापर करावा हे संस्कार विधि जिजाऊसृष्टि सिंदखेडराजा,जिजाई प्रकाशन पुणे येथून प्रकाशित झाले आहेत . "शिवधर्म ठरावा विश्वधर्म".....

Monday 13 August 2012

वाघ्या कुत्रा हटवाच !!!!!

वाघ्याचा गोंडा आणि वाघ्या समर्थक... रायगडावरून वाघ्या हटविल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांनी असे चित्र उभे केले कि वाघ्या हटविन्याला रायगड स्थानिक लोकांचा विरोध आहे आणि ते संभाजी ब्रिगेडच्या विरोधात गेलेआहेत आणि tv वर पण अश्याच लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या ज्यांना वाघ्या नावाचंकुत्र देखील ओळखत नाही आणि जे संभाजी ब्रिगेड चा द्वेष करण्यात शेपटीला भाशिंग बांधून तयार असतात पण सत्य काहीतरी वेगळेच आहे रायगड मधील मराठा समाज तर ब्रिगेडच्या पाठीशी होताच पण इतर समाज देखील वाघ्याला हटाव ह्याच भूमिकेचा होता पण प्रसिद्धी माध्यमांनी हि बातमी मुद्दामून दडवली आणि महाराष्ट्त्रातल ्या लोकांसमोर वेगळेच चित्र निर्माण केले.पुढे काही बहुजन समाजातल्या विविध जातीच्या नेत्यांच्या वाघ्याविशयीच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत त्यावरून सत्य काही तरी वेगळेच आहे हे कळत.रायगड कोकणस्थ तेली समाजसेवा संस्था सल्लागार आणि विचारवंत श्याम घोडके,चर्मकार संघटना रायगड जिल्हाध्यक्ष प्रदीपभाई भोयर,रायगड जिल्हा बुरुड समाज अध्यक्ष संदेश्भाई नागे,बाबासाहेबा ंचे नातू आनंदराजआंबेडकर,नव्बौद् धांचे नेते जोगेंद्र कवाडे,आदरणीय वामन मेश्राम साहेब ह्या सर्व जातीय नेत्यांनी संभाजी ब्रीगेद्चीच बाजू घेतली आणि वाघ्या हा शिवरायांच्या अपमानाचा क्षण आहे आणि तो उद्ध्वस्तच केला पाहिजे हेच सांगितले तसेच प्रसिद्धी माध्यमांनी दुसरी एक वावडी उठवली कि धनगरांचा वाघ्या काढण्याला विरोध आहे पण गोपाल कोल्हे वरिष्ठनेते धनगर समाज अकोला ह्यांनी रायगडावरील वाघ्या शिवरायांचीच नव्हे तर मल्हारराव होळकरांची बदनामी करणारा आहे म्हणून तो त्वरित हटवावा ह्या मागणीसाठी कल्लेक्टार कार्यालयासमोर दिवसभर धरणे धरा आंदोलन करून सामाजिक ऐक्याचे प्रदर्शन घडवले पण प्रसिद्धी माध्यमांनी जाणीवपूर्वक ह्या गोष्टी लपविल्या या सर्व लोकांच्या प्रतीक्रीयावरून एव्हढेच स्पष्ट होते कि वाघ्याला समर्थन देणार्यांच्या सोबत कुठलाचसमाज नाही तर फक्त वाघ्याचा गोंडा आहे आता तोगोंडा फक्त घोळायचा कि चोळायचा हा त्या समर्थकांचा प्रश्न आहे........
जय जिजाऊ ...... जय शिवराय..... जय मल्हार..... - शिवश्री प्रदीप इंगोले

Tuesday 7 August 2012

वाघ्या का हटवला

वाघ्या कुत्र्याचे शिल्प संभाजी ब्रिगेड च्या कार्यकर्त्यांनी का काढले ?? किल्ले रायगडावरील वाघ्या कुत्र्याचे शिल्पसंभाजी ब्रिगेड च्या कार्यकर्त्यांनी का काढले ?? १.शिवरायांच्या समाधी शेजारी बसवण्यात आलेला वाघ्या कुत्रा हा पूर्णपणे काल्पनिक होता.त्याचा कोणताच उल्लेख समकालीन किंवा उत्तरकालीन साधनात नाही.असे शिल्प बसवण्यामागे व होळकरांची कथा प्रसिद्ध करण्यामागे शिवप्रेमी होळकर आणि शिवाजी महाराज यांची बदनामी एवढाच कट होता. २. शिवकालीन समकालीन साधने, बखरी,मोघल,इंग्रज,प्र­ोतुगीज, इत्यादी दस्तावेजामध्ये कुठेही वाघ्या कुत्र्याचा उल्लेख नाही.. ३. हि दंतकथा ,पहिल्यांदा ची.ग.गोगटे यांच्या १९०५ साली प्रसिद्ध केलेल्या "महाराष्ट्र देशातील किल्ले"या पुस्तकात आहे. ४."राजधानी रायगड" (१९२९) या महत्वाच्या अभ्यासपूर्ण पुस्तकात वाघ्याच्या कुत्र्याचा उल्लेख नाही. ५.शिवसमाधीचा जीर्णोद्धार १९२६ते १९२७ या कालावधी मध्ये पूर्ण झाल्यानंतर ..त्यानंतर १० वर्षांनी म्हणजे १९३६ साली वाघ्या कुत्र्याचा पुतळा महाराणी पुतळाबाई यांच्यासमाधीवर बसविण्यात आला .. ६. शिवसमाधीचा जीर्णोद्धार झाल्यानंतर हि रायगड स्मारक समितीचे अध्यक्ष न.चि. केळकर(शाहू महाराज यांना स्वराज्यद्रोही म्हणणारे आणि ब्राम्हण ब्राम्हणेतर वादामध्ये ब्राम्हणाचे नेतृत्व करत होते.ज्या वेळेस शाहू महाराज बहुजन समाजाचे नेतृत्व करत होते ) व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्मारकासाठी पैसे जमा करण्याचे काम सुरूच ठेवले होते .याच वेळी महाराष्ट्रात ब्राम्हण-ब्राह्मणेतर­ वाद हि जोरात सुरु होता. शिवरायांच्या विषयी च्या पवित्र कार्यामाध्येही हा वाद डोकावला आणि शिवरायांच्या समाधी शेजारी महाराणी पुतळाबाई यांची समाधी असण्याऱ्या चौथऱ्यावरएका काल्पनिक कुत्राची समाधी उभी राहिली.. ७."वाघ्या"असे नामकरण राम गणेश गडकरी यांच्या "राजसंन्यास"या नाटकातून झाले.याच नाटकाने छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी राजेना बदनाम केले. त्याच नाटकातील मजकूर त्या पुतळ्याखाली लिहिला,हा तर मोठ्या बदनामीचा कळस झाला .. ८. रायगड स्मारक समितीतील मंडळी शिवस्मारकासाठी निधी जमवायला इंदूर येथे होळकर संस्थानिकांकडे गेली होती. शिवरायांच्या स्मारकासाठी पैसे देणे इंग्रजांना आवडणार नाही असे तुकोजीराव होळकर यांची खात्री होती म्हणून त्यांनी समितीच्या सभासदाची गाठ घेण्यास टाळाटाळ केली.कारण सांगितले कि होळकर राणीसाहेबांचे लाडके कुत्रे वारले होते त्यामुळे त्याचे सुतक असल्यामुळे भेट होऊ शकणार नाही.स्मारक समितीची माणसे चिकाटीची आणि चाणाक्ष होती..त्यांनी आपली गरज आणि महाराजांची व्यावहारिक अडचण लक्षात घेऊन त्यांनी अफलातून तोडगा सुचवला. महाराजांनी त्यांच्या लाडक्या कुत्र्याचा पुतळा उभारावा. कुत्र्याचा पुतळा उभारण्यात तर काही इंग्रजद्रोह नाही. इंग्रज अवकृपेची भीती नाही. तोडगा उपयोगी पडला होळकरांनी देणगी दिली. आणि समितीने काल्पनिक कुत्र्याचा पुतळा रायगडवर उभारला अशी आख्यायिका आहे..हि आख्यायिका शिवप्रेमी तुकोजीराव होळकर यांची बदनामी करणारी आहे..ज्यांनी शिवचरित्र जगभर पोहचवले ,शाहू महाराज यांचे नातेवाईक होते त्यांनी आणि शाहू महाराज यांनी ठरवून २५ धनगर मराठा विवाह घडवून आणले .. ९. शिवरायांच्या समाधी शेजारी शिवरायांच्या मृत्यूनंतर सती गेलेल्या महाराणी पुतळाबाई यांची समाधी होती त्यावर काल्पनिक नाटकातील कुत्र्याचा पुतळा बसविण्यात आला आहे त्यामुळे महाराणी पुतळाबाई यांचा अवमान होत आहे तसेच शिवरायांचाही अवमान होत आहे..त्यामुळे समस्त शिवप्रेमीचां राग अनावर होतआहे .. १०. स्वराज्य स्थापन करीत असताना शिवरायांच्या सोबत स्वराज्यासाठी लढलेल्या असंख्य सेनापती,शूरवीर मावळे,स्वराज्याची संकल्पना शिवरायांच्या मनात बिंबवणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊआऊसाहेब या पैकी कुणाचीही समाधी तत्कालीन राजधानी रायगडावर नाही .परंतु काल्पनिक नाटकावर आधारित वाघ्याकुत्र्याची समाधी कशी काय ?? मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड चे कार्यकर्ते हे शिवप्रेमी आहेत त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी पुतळाबाई यांचा होत असलेला अवमान कदापी सहन करू शकत नाही ..याच भावनेतून १ ऑगस्ट २०१२ रोजी संभाजीब्रिगेड चे शिवक्रांतीवीर शिवश्री महेश चव्हाण(सोलापूर) व शिवश्री नितीन रोठे पाटील(नाशिक) यांच्या नेतृत्वाखाली असंख्य संभाजी ब्रिगेड च्या मावळ्यांनी अनऐतिहासिकवाघ्या कुत्र्याचे शिल्प काढून टाकले होते. परंतु शासनाने पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी वाघ्या कुत्राचे शिल्प बसविले. त्यामुळे हे सरकार शिवप्रेमी आहे कि श्वानप्रेमी आहे ? असा प्रश्न पडतो.. वरील सर्व मुद्दे लक्षात घेऊन महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींनी महाराणी पुतळाबाई व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या होत असलेल्या अवमानाच्या विरोधात, आपल्या अस्मितेसाठी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन संभाजी ब्रिगेडच्या वतीने तमाम शिवप्रेमींना करण्यात येत आहे . समस्त बहुजन समाजाला ब्राम्हणी गुलामगिरीतून मानसिकदृष्ट्या मुक्त करण्यासाठी हे प्रतीकात्मक आंदोलन आहे. बहुजन समाजात जाणीवपूर्वक फुट पाडणाऱ्या प्रवृत्तीचा आम्ही निषेध करत आहोत ... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

Tuesday 31 July 2012

१ ऑगष्ट हाच खरा मराठी भाषा दिन!

शिवशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांचा जन्म १ ऑगष्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात वाटेगाव या लहान गावात झाला, करोडो विश्वे दरिद्रे असलेल्या अर्धवट भिंती व छत असलेल्या खुराड्यात झाला असे हे अण्णाभाऊ गरीबच निरक्षर पोर.!! गावाच्या शाळेत नाव घालण्या साठी व दुसऱ्यादिवशी पहिल्याच प्रहरी बामन शिक्षकाडून अपमानित होण्यापुरता अण्णाभाउंचा शाळा व शिक्षणाचा संबंध. तांत्रिक दृष्ट्या पूर्ण निरक्षर, अशिक्षित व्यक्ती, अश्या अण्णाभाउंनी मराठी साहित्यातील लोकवाङमय, कथा, नाट्य, लोकनात्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले. अण्णाभाउ मुंबईत रिकाम्या पोटी मराठी माणूस उभा करून त्यातला मराठी माणूस जागा करीत होते. अण्णाभाउंनी एकूण पुस्तके/ग्रंथ संख्या"७७" आहे, अण्णाभाउंनी छत्रपती शिवरायांचे चरित्र रशिया पर्यंत पोवाड्यातून सांगितले पुढे त्याचे रशिअन भाषेमध्ये भाषांतर झाले आणि रशिया च्या राष्ट्रपती कडून त्यांचा सन्मान देखील झाला, तमाश्यात गणामध्ये असणारी गणेश वंदना अण्णाभाउंनी झिडकारून व मातृभूमिसह शिवरायांना वंदन असणारी परंपरा रूजू केली ती अशी, "प्रथम मायभूच्या चरणा छत्रपती शिवबा चरणा स्मरोनी गातो | कवना ||" "माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होतीय काहिली" हे अतिसुंदर काव्य देखील त्यांनीच लिहिले आहे. संयुक्त महाराष्ट्र देखील अण्णाभाउंनी लोककलातून समाजास दिलेल्या दिव्या दृष्टीमुळेच साकार झाला. १६ ऑगष्ट १९४७ साली "ये आझादी जुठी हे देश किजनता भुकी हे" असा नारा शिवाजी पार्क वर दिला तेव्हा त्या दिवशी रौद्र रूप धारण केलेल्या उभ्या पावसाची नोंद अद्याप देखील झाली नाही, तरी अण्णाभाऊ मागे हटले नाहीत. अण्णाभाउंच्या वैजयंता, आवडी, माकडीचा चाल, चिखलातील कमळ, वारणेचा वाघ, अलगुज, फकीर या सात कादंबऱ्यावर मराठी भाषेत निघालेले चित्रपट सुपरहिट ठरले. चार चित्रपटांना विविध पारितोषिके मिळाली, अण्णाभाऊ यांच्या साहित्यातून राजकीय क्रांती व सामाजिक परिवर्तन झाले. अण्णाभाउंना केवळ ५० वर्षाचे आयुष्य लाभले!! याउलट, कुसुमाग्रज हे पुण्यातील श्रीमंत घरातील होते पुण्यात शिक्षण झाले तसेच उर्वरित शिक्षण मुंबई मध्ये, पुढील आयुष्य अमराठी लोकांची चाकरी करण्यात घालवली, तसेच१४(कादंबरी, ललित लेख, कविता संग्रह, नाटक)+अनुवादित बरेच लिखाण केले, पण कुठेही मराठी, भूमिपुत्र, संघर्ष, श्रमकरी, कष्टकरी,शेतकरी यांच्या व्यथा मांडल्या नाहीत शिवाय त्यांना पेशवाई व बामन शाहीची आग नव्हती, आणि सांगतात आयुष्य भर मराठी ची सेवा केली, त्यांना ८७ वर्षाचे आयुष्य लाभले........!! ....पण या पार्श्वभूमीवर अत्यंत प्रतिकूल वातावरणात, परंपरागत निरक्षर वातावरणात, वाईट-रुढ्या परंपरा जोपासणाऱ्या समाजात धर्मानेच शिक्षण-सत्ता-संपती नाकारलेल्या समाजात, अज्ञान गरिबी हेच भांडवल असलेल्या कुटुंबात, शेकडो पिढ्या अक्षर ओळख नसलेल्याजातीत जन्माला येऊन संपूर्ण जगाला ज्ञानी वस्वावलंबी करणारे महात्मा फुले, सावित्रीमाई फुले, डॉ. बाबासाहेब, प्रबोधनकार ठाकरे, साहित्य सम्राट अण्णाभाउ साठे, शाहीर अमरशेख, बहिणाबाई, बाबुराव बागुल, वामनदादा कर्डक, डॉ. सरोजिनी बाबर, संत गुलाबराव महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कृ.बा. बाबर, अश्या अनेक बहुजनांनी कुसुमाग्रजांपेक्षा लाखो पटीने लिखाण केले, मराठी भाषाच नव्हे तर भाषा-प्रांत समुद्ध केला, ते कोणीही बामन नव्हते हीच कमतरता आहे. म्हणूनच अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत असताना देखील मराठी साहित्य, शिवचरित्र परदेशात प्रसार करणाऱ्या साहित्य सम्राट शिवशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांचा जन्मदिन १ ऑगष्ट हाच खरा मराठी भाषा दिन !!

Friday 20 July 2012

How Shivaji demolished Manusmriti

Shivaji violated many laws of Manusmriti. Here is a brief account of his Anti-Manusmriti activities. Shivaji was a great king of medieval Maharashtra . He was contemporary of Moghul Emperor Aurangzeb and Ali Adilsah, Sultan of Bijapur. In very odd situations, Shivaji was successful in establishi ng his own kingdom. Although people know him as a Hindu King, he was not a Vedic. Actually he was a follower of Shaivism in his personal life. But as a King, hewas not in favor or against other religions. He was a true secular. However, he never supported the holy law book of Vedics known as Manusmriti, which was imposed on Indians for more that two millenniums. There are at least eight instances, where he breached the laws imposed by Manusmriti. Giving Arms to Shudra People According to the Manusmriti, only warrior communities, i.e.Kshatriyas had been given theright of bearing arms. Other people like Shudras and atishudras were banned from this right and they had no right of joining army. Shivaji breached this rule and invitedpeople from all sections of thecommunity to join his army. Shivaji’s army was made of cultivators, craftsmen, tribals, fishermen and people living at outskirts of villages. All these people were Shudras and atishudras according to the Manusmriti. Collaboration with Mlenchh People Although fanatic Vedic historians have projected himas an anti-Muslim King, Shivaji was not against Islam or Muslims. You can see a highnumber of Muslim officers and soldiers in his Navy, Artillery and army. The number of Shivaji’s Muslim officers and soldiers was far bigger than that of Vedic Brahmins. We should remember that both the Chiefs of Shivaji’s navy and artillery were Muslims. Even many of Shivaji’s bodyguards were Muslims. A division of Shivaji’s army was particularly for Muslims, having 700 soldiers. This number is definitely a big one, as Shivaji’s army was a not very big and all the battleshe fought were with help of atiny number of soldiers. Collaborating with Muslims was also a breach of the rules of Manusmriti, as according toit Muslims can be classified as Mlenchh people. Manusmriti never allowed accepting Mlenchh people to collaboratewith. Opposing Tradition of Sati Shivaji breached the laws of Manusmriti again and again. According to Manusmriti, if a man dies, his wife also has to die by jumping in the funeral pyre. This tradition was known as Sati. When Shivaji’s father Shahaji died, Jijau, Shivaji’s mother decided to become a Sati, but Shivaji opposed to do so. This was again a breach of the laws of Manusmriti. Traveling through Sea In another instance of breaching the laws imposed by Manusmriti, Shivaji founded his own navy, and hehimself traveled through sea and even took part in attack on enemy territories through sea routs. Manusmriti does not allow traveling by see andthe offender has to perform penance for it. This tradition was observed even until the first half of last century. But Shivaji breached the rule and never performed a penance for it. Remember that it was 17 th century and the rules were very strict at that time. His son learned Sanskrit Language Manusmriti does not allow people other than Brahmins to learn, speak, and write or even to listen Sanskrit language. But overthrowing this rule, Shivaji arranged tutoring of this language for his son Sambhaji. Sambhaji became scholar of this language and wrote a book inSanskrit. Thus we see that both Shivaji and Sambhaji were offenders according to the Manusmriti. Reconvertion Netaji Palekar was an officer in army of Shivaji. Eventually, he got converted to Islam. Shivaji reconverted him. His another officer Bajaji Nimbalkar had also adopted Islam. Shivaji not only reconverted Bajaji, but made him his sister in law by arranging his marriage with own daughter. This was surely against Manusmriti lawas as Manusmriti does not permit such things. Marrying with a Dalit Woman After establishment of his own kingdom, Shivaji wantedto coronate himself, but the Brahmins opposed to do so. They declared that Shivaji wasnot a Kshatriya but a Shudra, and according to Manusmriti, a Shudras can not become a king. So Shivaji coronated himself by inviting a Brahmin from Kashi, who take a huge amount of gold coins the coronation ceremony. But later Shivaji arranged anothercoronation according to Shakttradition. For performing the rituals, according to the Shakt rules, he married with an Atishudra (Dalit) girl. This wasalso an offence of breaching the laws of Manusmriti.

Wednesday 18 July 2012

साहित्य सम्राट : अण्णाभाऊ साठे

आजवर भरपूर कादंबऱ्या वाचल्या. पण इतर पाठ्यपुस्तके, माहिती पुस्तके, आत्मचरित्रे याबरोबर आपण कादंबऱ्याही का वाचव्या? कारण, कादंबऱ्यातच लेखकाची सर्व शक्ती पणाला लागते ! कादंबरीतच लेखकाच्या पूर्ण विचारशक्तीची जाण होते. लेखकाला हे सर्व कथात्मक कसे सुचत असावे, स्वतःस असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही! लेखकाचीच विचारशक्ती पडद्याबिगर आपल्या डोळ्यासमोर कादंबरीतील घटनाचीत्र दाखवत असते. कथेतील चुरस जाणून घेण्यात आपण कादंबरी वाचनाच्या ओढीला लागतो. हे लेखकाला सुचलेल्या कथेमुळे, प्रसंगामुळे, पात्रांमुळे शक्य होते. यात आज आम्हाला आण्णाभाऊ साठेंची आठवण आल्याशिवाय राहणार नाही, त्या काळात जातीवादामुळे आण्णाभाऊ साठे शिक्षणापासून वंचित राहिले. मातंग समाजातील मुलगा म्हणून ब्राह्मण मास्तरांनी अण्णाभाऊ साठेंना शाळेतून बाहेर काढले. परंतु आज आण्णाभाऊ साठेंची लौकिकता सांगावी लागत नाही. दीड दिवस शाळेत गेलेले आण्णाभाऊ साठे यांची 'फकिरा' नावाची कादंबरी M. A.च्या अभ्यासक्रमात आहे. आण्णाभाऊ साठेंनी तब्बल ३५ कादंबऱ्या लिहिल्या. फकिरा, वैजयंता, चिखलातील कमळ, वारणेचा वाघ, अलगूज, कवड्याचे कणीस, पाझर, वैर, डोळे मोडीत राधा चाले, गुलाम, चित्रा, धुंद रानफुलाचा, रानगंगा, मास्तर, मंगला, जीवंत काडतूस, तास, संघर्ष, रूपा, रानबोका, फुलपाखरू अशा त्यांच्या काही कादंबऱ्या. 'फकिरा'सारख्या काही सातासमुद्रापलीकडे पोहचल्या. ३५ पैकी ७ कादंबऱ्यावर चित्रपट बनवण्यात आले. अण्णाभाऊ साठेंचा कथासंग्रह खूप मोठा होता. बरबाद्या कंजारी, फरारी, लाडी, भानामती, पिसाळलेला माणूस, चिरानगरची भुतं, निखारा, नवती, आबी, गजाआड, क्रुष्णा काठच्या कथा, खुळंवाडी अशी तब्बल तेरा नाटकं आण्णाभाउंनीप्रसिद्ध केली. सुलतान , पेंग्याच लगीन, इनामदार यांचाही या यादीत समावेश आहे. याबरोबर साठेंनी शिवरायांचा स्वराज्य संदेश ही पोवाड्यातून लोकांपर्यंत पोहचवला, म्हणून लोकांनी त्यांना लोकशाहीर ही पदवी बहाल केली. याचबरोबर यांनी नेसरीच्या खिंडीतमृत पावलेल्या प्रतापराव गुजर अशा पराक्रमीमावळ्यांवर 'अग्निशिखा' ही ऐतिहासिक कादंबरी लिहिली. अकलेची गोष्ट, खापऱ्या चोर, कलंत्री, बिलंदर बुडवे, बेकायदेशीर, शेटजीचं इलेक्शन, पुढारी मिळाला, मूक मिरवणूक्, माझी मुंबई, देशभक्त घोटाळे, दुष्काळात तेरावा असे अनेक तमाशेही साठेंनी प्रसिद्ध केले. 'माझा रशियातील प्रवास' हे साठेंचे प्रवास वर्णन ही रशियात प्रसिद्ध झाले. याच बरोबर नानकीन नगरापुढे, स्टलिनग्राडचा पोवाडा, बर्लिनचा पोवाडा, बंगालची हाक, पंजाब-दिल्लीचा दंगा, तेलंगणाचा संग्राम, महाराष्ट्राची परंपरा, अमरनेरचे अमर हुतात्मे, मुंबईचा कामगार, काळ्याबाजाराचा पोवाडा असे त्यांचे सु-प्रसिद्ध पोवाडे. अकलेची गोष्ट, शेटजींचे इलेक्षन, बेकायदेशीर, माझी मुंबई अर्थात मुंबई कोणाची?, मूक मिरवणूक, लोकमंत्र्यांचा दौरा, खापर्‍या चोर, बिलंदर बडवे यांसारखी वगनाटयेअण्णाभाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाची पायाभरणी करण्यासाठी लिहिली. त्यांतील गरूडाला पंख, वाघाला नखं तशी ही (मुंबई) मराठी मुलुखाला हे कवन संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत विलक्षण गाजले. सांगली जिल्ह्यातील खेडेगावात एका गरीब कुटुंबात जन्माला आलेले अण्णाभाऊ साठे फक्तसाहित्य सम्राटच नव्हे तर समाजसुधारकही होते. अण्णाभाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्याचळवळीत लोकनाट्यांद्वारे जनजागृतीसाठी प्रयत्न केले. वर्गविग्रहाचे तत्त्वज्ञान सर्वसामान्य जनांपर्यंत पोहोचविणारा, महाराष्ट्राच्या ग्रामीण मातीतील बोली आणि कलांचा संस्कार घेऊन आलेला सिद्धहस्त कादंबरीकार, लोकनाट्यकार म्हणून त्यांची प्रमुख भूमिका आहे. अण्णाभाऊ लावण्या, शाहिरी, पोवाडा या लोककलांमध्ये तरबेज होते. मराठीभाषिक स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीकरता इ.स. १९५० च्या दशकात चाललेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी लोककलेच्या माध्यमातून लोकप्रबोधन घडवून आणले. यातून अण्णाभाऊ साठेंची कारकीर्द आजही चालू आहे. आपल्यासारख्या नवख्यांना याच्यामुळेच प्रेरणा मिळते म्हणून आज आम्ही अण्णाभाऊ साठेंना स्मरूनच लेखणी उचलतो! ३६५ दिवसापैकी १ दिवस मराठी दिन साजरा केला जातो,उरलेले ३६४ दिवस अण्णाभाऊ साठेंच्या नावे मराठी दिन साजरा करूयात.

Saturday 14 July 2012

तुम्ही मराठे असाल, परंतु तुमची जात कोणती...?

महात्मा ज्योतिराव फुले कुणबी, माळी, मांग, महार या जातींचा उल्लेख एकत्रितपणे करतात, फुल्यांच्या संपूर्ण वाङ्मयात असे उल्लेख ठिकठिकाणी येतात. ‘ब्राह्मणांचे कसब' हा ग्रंथ फुले यांनी या जातींनाच अर्पण केला आहे. अर्पण पत्रिकेत फुले म्हणतात, ‘महाराष्ट्र देशांतील कुणबी, माळी, मांग, महार यांस हे पुस्तक ग्रंथकत्र्याने परम प्रीतीने नजर केले असे'. यावरून फुले यांची या जातींविषयी असलेली तळमळ दिसून येते. आपण मराठा-कुणबी हे एक असल्याविषयीचा महात्मा फुले यांचा अधिक स्पष्टपणे समोर येणारा अभिप्राय पाहणार आहोत. फुले यांचे ‘शेतकरयाचा असूड' हे पुस्तक जगप्रसिद्ध आहे. हे पुस्तक लिहित असताना फुले यांची अनेकांशी चर्चा झाली. त्यातील दोन गृहस्थांसोबत झालेल्या चर्चेचा तपशील ज्योतिरावांनी पुस्तकाच्या शेवटी परिशिष्टात दिला आहे. त्यातील पहिल्या परिशिष्टाचे शीर्षक आहे ‘खासा मराठा म्हणविणाराङ्क. हे शीर्षकच अन्वयर्थक आहे. फुले यांची लेखनकामाठी सुरू असताना एक गृहस्थ त्यांच्या घरी येतात. गृहस्थांसोबत झालेला चर्चेचा तपशील फुले यांनी या परिशिष्टात दिला आहे. त्यातील काही अंश पुढे देत आहे- ‘‘त्यांनी (फुले यांच्याकडे आलेल्या गृहस्थाने) आपला मोहरा मजकडे फिरवून , आपणहूनच मला प्रश्न केला की, तुम्ही मला ओळखले नाही काय?'' मी म्हणालो, ‘‘नाही महाराज, मी तुम्हाला ओळखले नाही. माफ करा.'' गृहस्थ म्हणाला, ‘‘मी मराठी कुळातील मराठी आहे.'' मी - तुम्ही मराठे असाल, परंतु तुमची जात कोणती?'' गृ. - ‘‘माझी जात मराठे'' मी - ‘‘महाराष्ट्रात जेवढे म्हणून महारापासून तो ब्राह्मणापर्यंत लोक आहेत, त्या सर्वांसच मराठे म्हणतात. तरी तुम्ही अमुक जातीचे आहात याचा उलगडा तेवढ्याने होत नाही.'' गृ. - ‘‘तर मी कुणबी आहे असे समजा.'' महात्मा फुले यांनी दिलेला हा संवाद इतका स्पष्ट आहे की, मराठा आणि कुणबी या जाती एकच आहेत, हे सांगण्यासाठी आणखी वेगळा पुरावा देण्याची गरजच राहिलेली नाही. ‘‘महाराष्ट्रात जेवढे म्हणून महारापासून तो ब्राह्मणापर्यंत लोक आहेत, त्या सर्वांसच मराठे म्हणतात.ङ्कङ्क हे महात्मा फुले यांचे वाक्य ऐतिहासिक सत्य आहे. महाराष्ट्रातील फौज कोणाच्याही नेतृत्वाखाली लढली, तरी तिला मराठा फौज असेच म्हटले जात असे. कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यातील प्रत्येक शिपाई हा मराठा म्हणूनच ओळखला जात होता. पेशवाईच्या काळात मराठे पाणिपतावर लढले. तेव्हा या फौजेला कोणी पेशव्यांची फौज म्हटले नाही. तिला मराठ्यांची फौज असेच म्हटले गेले. आजही महाराष्ट्राबाहेर मराठी लोकांना मराठे असेच म्हटले जाते. त्यामुळे मराठ्यांची खरी जात कुणबी हीच आहे, हे सिद्धहोते...!!!

Wednesday 11 July 2012

कुणबी-मराठा एकच : तुकोबांच्या गाथ्यातील पुरावे

बरे झाले देवा कुणबी केलो मराठा आणि कुणबी या जाती एकच आहेत, हे पाहण्यासाठी आपण आता जगद्वंद्य जगद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराज यांनी आपल्या अभंगांत मागे ठेवलेले पुरावे पाहणार आहोत. संत तुकाराम हे जन्मजात महाकवी होते. त्यांनी आपल्या मनातील भाव व्यक्त करताना कोणताही आडपडदा ठेवला नाही. घरात पत्नी रागावली तरी त्यांनी त्याचे अभंग रचून ठेवले. मन आवरताना होणा-या यातनाही अभंगरूपाने लिहून ठेवल्या. त्यासाठी एकच उदाहरण देते. तुकाराम म्हणतात, काय काय करितो या मना । परी ते नाईके नारायणा ।। संत तुकाराम प्रत्यक्ष कविताच जगत होते. सर अ‍ॅलेक्झांडर ग्रँट या इंग्रजी विद्वानानेतुकारामांना ''भारताचे राष्ट्रीय कवी'' अशी उपाधी दिली होती. ( ग्रँट यांच्या विषयीच्यामाहितीसाठी तळटीप पहा. ) या पाश्र्वभूमीवर संत तुकारामांनी कुणबी या जातीबद्दल मागे ठेवलेल्या पुराव्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे संत तुकारामांचा उल्लेख करताना विविध प्रकारच्या जातीवाचक उपाध्या लावला जातात. परंतु त्या सर्व त्यांच्या व्यवसायानुसार लावल्या गेल्या. त्यांना वाणी म्हणत. तुका झाला वाणी । चुकवुनी चौरयांशीच्या खाणी ।। अशा अभंग पंक्तीमुळे त्यांना वाणी म्हटले गेले. तुकारामांकडे मोठा व्यापार-उदिम होता. त्यामुळे त्यांनी हा उल्लेख प्रतिकात्मकरित्या केला आहे. तुकारामांनी सर्व संसाराचा त्याग केला होता; म्हणून त्यांना गोसावी म्हटले गेले. त्यांच्या घराण्यात महाजनकी होती; म्हणून त्यांना महाजन म्हणण्याचीही प्रथा होती. परंतु या सर्व उपाध्या होत. त्याचा तुकारामांच्या जातीशी काहीही संबंध नाही, हे येथे लक्षात घेतले पाहिजे. तुकारामांचे मुळचे घराणे क्षत्रियांचे होते. परंतु कालौघात ब्राह्मणांनी स्वत: वगळता इतर सर्व वर्णांना वेदाधिकार नाकारला. त्यामुळे क्षत्रिय जातीही शुद्र गणल्या गेल्या. त्यामुळे तुकाराम स्वत:चा उल्लेख शुद्र असा करतात. असा उल्लेख करताना त्यांच्या मनातला नम्र भावही प्रकट होतो. भेदाभेद भ्रम अमंगळ या आपल्या उक्तीशी प्रमाणिक राहून तुकाराम स्वत:ला शुद्र म्हणवून घेण्यात धन्यता मानतात. संत तुकारामांच्या गाथ्यात असे असंख्य अभंग आपणास दिसून येतात. मात्र या सारयांत न पडताएकच उदाहरण देते. ‘‘आपणांस वैराग्य कसें प्राप्त झाले याविषयी तुकोबारायांचे संतांशीं व देवाशीं संभाषण'' या शीर्षकाखाली काही अभंग तुकाराम गाथ्यात आहेत. त्यातील पहिल्याच अभंगातील काही पंक्ती अशा - याती शुद्र वैश्य केला वेवसाव । आधी तो हा देव कुळपूज्य ।।१।। नये बोलो परि पाळिले वचन । केलिया प्रश्न तुम्ही संती ।।२।। दुष्काळे आटिले द्रव्य, नेला मान । स्त्री एकी अन्न करिता मेली ।।४।। लज्जा वाटे जीवा त्रासलो या दु:खे । वेवसाव देखे तुटी येता ।।५।। या अभंगात तुकाराम स्वत:ला शुद्र म्हणतात. वैश्य (व्यापार) व्यवसाय केल्याचे नमूद करतात. मी वैश्य आहे असे म्हणत नाहीत. याचाच अर्थ तुकाराम हे वैश्य नव्हते. मग ते कोण होते? त्यासाठी खालील अभंग पाहा - बरे झाले देवा कुणबी केलों । नाही तरी दंभे असतो मेलो ।।१।। भले केले देवराया । नाचे तुका लागे पाया ।।२।। तुका म्हणे थोरपणे । नरक होती अभिमाने ।।६।। या अभंगात संतश्रेष्ठ तुकाराम देवाला उद्देशून म्हणतात, ‘‘देवा बरे झाले तू मला कुणबी केले. उच्च जातीत जन्माला घातले असतेसतर मी फुकाचा ताठा मनात बाळगून मेलो असतो.'' आपण कुणबी असल्याचा आनंद होऊन तुकाराम नाचतदेवाच्या पायी लागतात. हे दुसरया कडव्यावरून स्पष्ट होते. या पुराव्यांवरून एक गोष्ट सूर्य प्रकाशाइतकी स्पष्ट आहे कि, तुकाराम हे कुणबी जातीत जन्माला आले होते. वारकरी संतांनी आपल्या जाती कधी लपविल्या नाहीत. या उलट संतांनी आपल्या जाती मिरविल्या. कारण कोणतीही जात श्रेष्ठ नाही, तसेच कोणतीही जात कनिष्ठही नाही, अशी त्यांची निस्सीम श्रद्धा होती. ‘भेदाभेद भ्रम अमंगळ' हाच वारकरी पंथाचा आत्मा होता. *कुणबी-मराठा पर्यायवाचक यातीनामे असो.* या वरून एक गोष्ट निर्विवाद सिद्ध होतेकी, तुकाराम कुणबी होते. पण खरा प्रश्न असा आहे की, यावरून कुणबी आणि मराठा या जाती एकच आहेत, हे सिद्ध होते का? याचे उत्तर आहे - होय, कुणबी आणि मराठा या जाती एकच आहेत, हे यावरून सिद्ध होते. तुकारामा नंतरच्या त्यांच्या बहुतेक पिढ्या आपली जात मराठा अशीच नोंदवित आहेत. तुकारामांचा मूळचा वंश शिवकालीन मोरे घराण्यातील आहे. त्यांचे वंशज आजही मोरे हेच आडनाव वापरतात. जावळीचे मोरे इतिहासात प्रसिद्ध आहेत. ते स्वत:ला पूर्वापार मराठा याच नावाने संबोधतात. याचाच अर्थ कुणबी आणि मराठा ही दोन्ही यातीनामे एकमेकांना पर्यायवाचक ठरतात.

Tuesday 26 June 2012

राजर्षी शाहूंचे शैक्षणिक कार्य


राजर्षी शाहूंचे शैक्षणिक कार्य-
तत्कालीन वर्ण-व्यवस्थेने शूद्र आणि सर्व स्त्रिया यांना शिक्षणाचा अधिकार नाकारून त्यांच्यावर अन्याय केला. महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीमाई यांनी दलित-बहुजनांसाठ ी आणि स्त्रियांसाठी शाळा काढल्या. तोच वारसा जपत शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात बहुजन समाजाच्या शैक्षणिकविकासाच्या अनुषंगाने मोलाची कामगिरी बजावली. महाराजांनी १९१७ साली कोल्हापूर संस्थानात सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा केला. हा कायदा करताना महाराजांनी पालकांनाही दंड ठेवला. जर एखाद्या पालकाचा मुलगा शाळेत आला नाही तर दरमहा १ रु. दंड ठेवला. शाहूंनी प्राथमिक शिक्षणावर भर दिला. कारण पाया पक्का असेल तरच माणसाची भावी शैक्षणिक प्रगती होऊ शकेलअसे महाराजांचे मत होते.ते म्हणत, “शिक्षणानेच आमचा तरणोपाय आहेअसे माझे ठाममत आहे. शिक्षणाशिवाय कोणत्याहीदेशाची उन्नती झाली नाही, असे इतिहास सांगतो.” शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या अनेक अडचणी समजावून घेवून महाराजांनी त्यावर उपाय केले. मागास, गरीब विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप व इतर सवलती दिल्या. विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतीगृहे बांधली. कोल्हापुरात हायस्कूल व कॉलेजची स्थापना केली. राजाराम कॉलेज मध्येमुलींची फी माफ केली. त्याकाळी काही शिक्षक अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजातीलकाही मुलांना व्हरांड्यात बसवत असत. ही गोष्ट महाराजांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शिक्षकांना जरब बसेल असे उपाय केले. सरकारी शाळेत शिवाशिव पळू नये व सर्व जाती-धर्माच्या विद्यार्थ्यांना एकत्र बसवावे असा वटहुकूम काढला. ज्या शाळा या हुकुमाचे पालन करणार नाहीत त्यांची ग्रांट वइतर सवलती बंद करण्याची तंबी दिली.
वेदोक्त प्रकरण-
शाहू महाराजांच्या जीवनाला कलाटणी देणारा सर्वात महत्वाचा प्रसंग म्हणजे वेदोक्त प्रकरण होय. शाहू महाराजांचा भटजी राजोपाध्ये यांनी महाराजांना शूद्र मानून त्यांचे विधी वैदिक मंत्राने न करता पुराणोक्त मंत्राने करणार अशी भूमिका घेतली.त्यामुळे महाराज दुखावले गेले. अनेक प्रकारेसमाज देवूनही भटजी त्याची भूमिका सोडत नाही असे दिसताच महाराजांनी त्याचे इनाम जप्त केले. परिणामीवाद अधिकच चिघळला. टिळकांनीही केसरीमध्ये अग्रलेख लिहून सामाजिक न्यायाचीबाजू न घेता भटजीची बाजू घेतली. आधीच महात्माफुलेंच्या सत्यशोधक चळवळीमुळे ब्राम्हण-ब्राम् हणेतर वाद धुमसत होता.त्यात टिळक आणिमहाराष्ट्रात ील बहुतांशी ब्राम्हण महाराजांच्या विरोधात एकवटल्यामुळे ब्राम्हणेतर समाजही महाराजांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. परिणामी महाराष्ट्रात ब्राम्हण आणि ब्राम्हणेतर असे दोन गट पडले. ब्राम्हणांचे नेतृत्व टिळकांकडे तर ब्राम्हणेतरांचे नेते शाहू महाराज. परिणामी टिळक आणि शाहू राजे यांच्यात वितुष्ट निर्माण झाले. खरेतर शाहू महाराजांचे भांडण ब्राम्हणांविरुद ्ध नव्हते तर त्यांच्या वर्चस्ववादी मानसिकतेविरुद्ध होते.विधी वैदिक मंत्रानेकेले काय किंवा पुराणोक्त मंत्राने केले काय ? काहीच फरक पडत नाही हे शाहू राजे जाणत होते. परंतु बहुजनांचे विधी वैदिक पद्धतीनेन करण्यामागे ब्राम्हणांचा वर्णवर्चस्ववाद असल्याने शाहुनीही आपली भूमिका सोडली नाही. या घटनेनंतर शाहू राजांनी सामाजिक न्यायाच्या लढाईला अधिक बळकटी मिळवून दिली.
शाहू महाराजांचे आर्थिक धोरण-
शाहू महाराजांनी उद्योगधंदे उभारण्याच्या दृष्टीने खास प्रयत्न केले.कारागिरांन ा आश्रय दिला. आपल्या संस्थानात सुत गिरणी चालू केली.त्यासाठी मोठी जमीन मोफत दिली. इचलकरंजी येथे जिनिंग कारखाना सुरु केला. त्यानंतर इतर ठिकाणी अशा प्रकारचे कारखाने सुरु केले. उद्योगधंदे आणि व्यापार वाढीसाठीशाहूंनी कारागिरांना अनेक प्रकारच्या सवलतीदिल्या. त्यांना राहण्यासाठी जमिनी दिल्या. बिनव्याजी कर्जे दिली. पाणीपुरवठ्याची मोफत सोय केली. रस्ते बांधले, रेल्वेच्या विकासास गती दिली. १८९५ साली शाहूपुरी ही व्यापारपेठ वसवण्यात आली.
राजर्षी शाहूंचा वारसा-
आज शाहू महाराजांचे काम बहुतांशी लोकांपर्यंत पोहचले आहे. शाहुराजांच्या या अद्वितीय कामगिरीमुळे सर्वसामान्य बहुजनांच्या हृदयात शाहूंना आदराचे स्थान आहे. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या युगपुरुषांच्या जोडीला शाहू राजांचे नाव घेतले जाते. पुरोगामी महाराष्ट्र घडवण्यात फुले-शाहू-आंबेड करी विचारांचा फार मोठा वाटाआहे.
आज शाहू महाराजांच्या जयंत्या-पुण्यति थ्या सर्वत्र साजऱ्या केल्या जातात. परंतु फक्त एवढे करून त्यांच्या विचार-कार्याचे चीज होणार नाही. शाहूंचा लढा हा समतेसाठी होता. आत्मसन्मानासाठी होता. वर्णवर्चस्वाच्य ा अहंकारी प्रवृत्तीविरुद् ध होता. आज शाहू राजांच्या पश्चात त्यांचाच जयजयकार करणारे, त्यांच्या नावाने सत्ता भोगणारे राज्यकर्तेगरीब प्रजेला छळत आहेत. भ्रष्टाचार, गुंडगिरीया प्रवृत्ती फोफावल्या आहेत. शाहूराजे फक्तपुजण्यापुरतेच राहिले आहेत. त्यांचा वारसा, त्यांचे विचार, कार्य आपण विसरलो आहोत. राजर्षी शाहूंनी प्रतिकूल परिस्थितीत आपल्या संस्थानात जनहितार्थ अनेक कायदे केले. प्रसंगी टीका, अपमान, बदनामी यांची पर्वा केली नाही. पण आजच्या राज्यकर्त्यांना ‘जादूटोणा व अघोरी प्रथाविरुद्ध कायदा’ करता येत नाही. राज्यकर्ते शाहूंच्या नावाने राजकारण करतात मात्र त्यांचा विचार जपताना कुणीच दिसत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे.
शाहूंच्या कार्याचे खरे चीज व्हावे असे वाटतअसेल तर शिक्षण घेवून उच्च पदे हस्तगत केली पाहिजेत. आपल्या अधिकाराचा, पदाचा वापरसर्वसामान्य जनतेच्या कल्याणाकरता केला पाहिजे. उपेक्षित, वंचितांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, जातीभेद नष्ट करणे, सामाजिक समता प्रस्थापित करणे ही शाहू राजांची अपूर्ण राहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करुया, हीच शाहुराजांना आदरांजली ठरेल.
26 जून हा राजर्षी शाहूंचा जन्मदिन सामाजिकन्याय दिन म्हणून साजरा केला जातो. शाहू महाराजांच्या कार्र्याला आणि विचारांना विनम्र अभिवादन।....

राजर्षी शाहू महाराज :लोक कल्याणकारी राजा

"सर्वसामान्य बहुजन समाजाला गुलामगिरीच्या दलदलीतून बाहेर काढून स्वाभिमानाचे नवे जीवन देणाऱ्या काही मोजक्या समाजसुधारकांमध् ये राजर्षी शाहूंचा समावेश होतो. राजर्षी शाहू आणि इतर समाज सुधारक यांच्यात महत्वाचा फरक म्हणजे राजर्षी शाहुंकडे राजसत्ता होती. त्याआधारे ते बहुजनसमाजाच्या हिताचे निर्णय राबवू शकत होते.त्यासाठी त्यांना दुसऱ्यांची मनधरणी करावी लागली नाही.राजर्षी शाहू हे प्रजावत्सल, दलितबंधू,समतेचे पुरस्कर्ते आणिनिधड्या छातीचे कर्ते समाजसुधारक होते." शाहू राजांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव व आईचे नाव राधाबाई होते. शाहूंचे बालपणीचे नाव यशवंतराव होते. १७ मार्च १८८४ रोजी शाहूंचे दत्तकविधान व राज्यारोहण झाले. यशवंतरावाचे दत्तकविधानानंतर ‘शाहू महाराज’असे नामकरण झाले. शाहूंनी आपल्या आयुष्यात जातीभेद निर्मुलन, अस्पृश्यता निवारण, स्त्रियांचा उद्धार, बहुजनांचा शैक्षणिक विकास, औद्योगिक प्रगती, शेतीचा विकास, धरणे,रस्ते ई. क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावली. आपली राजसत्ता खऱ्या अर्थाने उपेक्षित, वंचित समाजासाठी वापरली. त्यामुळे शाहू हे लोकांचेराजे झाले. आरक्षणाचे प्रणेते- मागासलेल्या वर्गाना प्रगतीच्या प्रवाहात आणायचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे, अशी कल्पना महात्मा जोतिबा फुले यांनी मांडली.राजर्षी शाहूंनी आपल्या अधिकारांचावापर करून ही कल्पना प्रत्यक्षात उतरवली. ६ जुलै १९०२ रोजी त्यांनी कोल्हापूर संस्थानात मागास जातींना ५० % जागा राखीव राहतील अशी घोषणा केली. त्याची त्वरित अंमलबजावणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून रिपोर्ट मागविले. शाहूंच्या या निर्णयाला तेव्हा सामाजिक कार्यकर्ते म्हणवणाऱ्या अनेक उच्चवर्णीय पुढाऱ्यांनी विरोध केला. शाहुंवर अनेक प्रकारचे आरोप केले. परंतु वंचितांच्या विकासाचे व्रत घेतलेल्या शाहूंनी कशाचीही पर्वा न करता आपले धोरण चालू ठेवले. तथाकथित गुन्हेगार जातींविषयी भूमिका- जातव्यवस्थेची शिकार झालेल्या अनेक जमाती त्या काळात चोऱ्या, दरोडे अशा चुकीच्या मार्गांचा अवलंब करत होत्या. सनातनी वर्णव्यवस्थेने त्यांना उपेक्षित ठेवून शिक्षण, सत्ता व संपत्तीचा अधिकार नाकारला. परिणामी त्यांची सर्वच क्षेत्रात अधोगती झाली. त्यांचा सामाजिक दर्जा खालावला. समाजाकडून मिळणारी अन्याय्य वागणूक व उत्पन्नाचे काहीच साधन नाही अशा दुहेरी संकटात सापडलेल्या मागास, भटक्या जमातीतील अनेक लोकांनी पोटापाण्यासाठी चोऱ्या, दरोडे अशा गोष्टींचा आधार घेतला. तत्कालीन ब्रिटीशसरकारने या जमातीवर गुन्हेगारीचा शिक्का मारला. त्यांना रोज गावकामगाराकडे हजेरी लावावी लागत असे. शाहुराजांना या लोकांची कणव होती. शाहू खऱ्या अर्थाने वंचितांचे राजे होते. त्यामुळे शाहूंनी ही हजेरी पद्धत बंद केली. या जाती-जमातीतील लोकांना संघटीत करून गुन्हेगारी कृत्यांपासून परावृत्त केले. त्यांना नोकऱ्या दिल्या. त्यांच्यातून पहारेकरी, रखवालदार नेमले, रथावर वाहक नेमले. त्यांना घरे बांधून दिली. राहण्याची व पोटापाण्याची सोय झाली. शाहुराजांचे प्रेम मिळाले. त्यामुळे या लोकांनी गुन्हेगारी कारवाया सोडून देवून ‘माणूस’ म्हणून जगायला सुरुवात केली. गुन्हेगारांना शासन करणारा सत्ताधीश सर्वत्र पहायला मिळेल. मात्र त्यांना प्रेमाने, मायेने आपलेसे करून समान सामाजिकदर्जा देणारा व त्यांच्यात स्वाभिमान निर्माण करणारा राजा विरळाच. राजर्षी शाहू आणि स्त्रियांची स्थिती- धर्मव्यवस्थेने स्त्रियांनाही अतिशय उपेक्षित ठेवले. त्यांचे हक्क-अधिकारनाका रले. स्त्रियांवर अनेक बंधने लादली.त्यामुळे स्त्रियांची एकंदर सामाजिकअधोगती झाली होती. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांना दुय्यम स्थान प्राप्त झाले होते. त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागे. स्त्रियांना कुणीही वाली उरला नव्हता.स्त्रिया ंची ही अवनती जाणून शाहू राजांनी त्यांच्या उन्नतीसाठी विशेष प्रयत्न केले. स्त्रियांसाठी अनेक चांगले कायदे केले. धर्माच्या नावाखाली देवांना मुले-मुली वाहण्याची अनैतिक पद्धत संस्थानात चालू होती. महाराजांनी जोगत्या-मुरळी प्रतिबंधक कायदा करून ही अमानुष पद्धतबंद केली. जातीभेदाचे प्रस्थ नष्ट व्हावे म्हणून संस्थानात आंतरजातीय-आंतरध र्मीय विवाहास कायदेशीर मान्यता दिली. तसा कायदा केला. आपल्या चुलत बहिणीचे लग्न धनगर समाजातील यशवंतराव होळकर यांच्याशी लावून दिले. तसेचत्या काळात संस्थानात शंभर मराठा-धनगर विवाह घडवून आणले. विधवांची दारूण परिस्थिती लक्षात घेवून पुनर्विवाह नोंदणीसंबंधी कायदा केला. त्यामुळे विधवांच्या परिस्थितीत बराच फरक पडला. त्यांना कायद्याने पुनर्विवाह करता येवू लागला. संस्थानातील अनेक समाजात ‘काडीमोड’संबंधी त्या-त्या जात-पंचायतींचे आपापले कायदे असत. हे कायदे पुरुषप्रधान संस्कृतीला साजेसे म्हणजेच पुरुषांना अनुकूल तर स्त्रियांना प्रतिकूल असत. त्यामुळे स्त्रियांवर नेहमी अन्याय होई. स्त्रियांच्या मतांना आणि भावनांना फारशी किंमत नव्हती. त्यामुळे स्त्रियांची कुचंबना होई. हे ओळखून शाहू महाराजांनी संस्थानात ‘काडीमोड’संबंधी कायदा केला. अशा प्रकारचे खटले रीतसर कोर्टात चालवण्याचे आदेश दिले. स्त्रियांवर अन्याय होऊ नये म्हणून त्यांनाही ‘काडीमोड’ घेण्याचे अधिकार दिले. स्त्रियांना क्रूरपणे वागवण्याच्या पद्धतीविरुद्धही शाहू राजांनी कायदा केला.स्त्रियांच ा शारीरिक व मानसिक छळ करणे, त्यांना उपाशी ठेवणे, मारहाण करणे अशा प्रकारच्या गुन्ह्यांसाठीकड क शिक्षा केल्या. त्यामुळे स्त्रियांना मोठा आधार मिळाला. राजर्षी शाहूंनी केलेल्या या अनेक स्त्री-उद्धारक कायद्यांमुळे स्त्रियांना सामाजिक प्रवाहात येण्यासाठी खूप मदत झाली.

Sunday 3 June 2012

जागण्याचे युग

जागण्याचे युग! आले आले जागा! विवेकाशी दगा! देऊ नका !! पिचाल्यांनो आता! दाखवा प्रताप ! फुका पश्चाताप! सोडोनिया!! चेतव ते बळ! अंतरीचे सारे! विकृत धुमारे! छातावया!! विधी निषेधाचे! संस्कार कुंपण! पुढे या त्यागून! स्वत्वासाठी!! झाले बहु झाले! गुलामीत जीणे! आता म्हणा गाणे! स्वातंत्र्याचे!!न्याय समतेला! आपलेसे करा! जातीचा पसारा! जाळा त्वरे!! कवी ...मनोज बोबडे

मी शेतकरी

मी जगतो या देशासाठी, मी मरतो या मातीसाठी, आत्मभान विसरून राबराब राबतो, तरीही पदरी निराशाच, शेताच्या बांधावर गोफण घेवून, करतो पिकांची राखण, पण, कुंपणानेच शेत खाल्ले तर, विचारच करवत नाही, चारही बाजूने कोंडमारा सहन करून, मी जगतो नव्या उमेदीने. मी या देशातील दलित, बहुजन शेतकरी, मला कोणी नाही वाली, सेझच्या नावाखाली साम्राज्यवादाची टांगती तलवार आणि, भूमिहीन होण्याची भीती, उराशी बाळगून, मी जगतो, या देशासाठी, या मातीसाठी, माझ्यासाठी.

Wednesday 30 May 2012

रयतेवर जिवापाड प्रेम करणारा राजा

छत्रपती शिवाजी महाराज यांनी लिहिलेल्या पत्रांमधून त्यांची संवेदनशीलता, प्रेम, शिस्त असे अनेक गुण दिसतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी सज्जनांच्या रक्षणासाठी व दुर्जनांच्या निर्दालनासाठी हाती तलवार घेतली. हा लढायांचा इतिहास तर आपणा सर्वांना ज्ञात आहेच. ढाल-तलवारीच्या पलीकडे जाऊन छत्रपती शिवाजीराजांनी रयतेबद्दल व्यक्त केलेल्या भावना, प्रजेच्या सुरक्षिततेसाठी, कल्याणासाठी घेतलेले निर्णय, काळजी, कळवळा त्यांच्या पत्राद्वारे आपणास प्रकर्षाने जाणवते. छत्रपती शिवाजीराजांनी रयतेवर केलेले जिवापाड प्रेम त्यांच्या विविध पत्रांवरूनआपणास समजते. २३ ऑक्‍टोबर १६६२ रोजी शिवाजी महाराजांनी सर्जेराव जेधे यांना एक पत्र लिहिलेले आहे. शाहिस्तेखानाचे संकट स्वराज्यावर येत आहे. त्याप्रसंगी रयतेची कशाप्रकारे काळजी घ्यावी, हे महाराजांनी सांगितलेले आहे.""मोगल प्रस्तुत तुमच्या तपियात धावणीस येताती म्हणौन जासुदानी समाचार आणिला आहे. तरी तुम्हास रोखा अहडताच तुम्ही तमाम आपलेतपियात गावचा गाव ताकिदी करून माणसे, लेकरेबाळे समतर तमाम रयेति लोकास घाटाखाले बाका जागा असेल तेथे पाठविणे. ये कामात हैगैन करणे ..... गावचा गाव हिंडोनु रातीचा दिवस करून लोकाची माणसे घाटाखाली जागा असेल तेथेपाठवणे. या कामास एक घडीचा दिरंग न करणे.'' रयतेच्या रक्षणासाठी एक क्षणाचाही विलंब करू नका, अशा सूचना शिवरायांनी प्रस्तुत पत्रात सर्जेराव जेधे यांना दिलेल्या आहेत. १९ मे १६७३ रोजी शिवाजी महाराजांनी चिपळूण येथील आपल्या जुमलेदार, हवालदार आणि कारकुनांना एक पत्र लिहिलेले आहे. यातून शिवरायांना शेतकऱ्यांबद्दल किती कळवळा होता, हे स्पष्टपणे लक्षात येते. लष्कराची छावणी चिपळूण येथे पडलेली असताना आपल्या अधिकाऱ्यांनी कशी काळजी घ्यावी, याबाबत लिहिलेल्या पत्रातील काही भाग "".......... पागेस अधिक बैठी पडली; परंतु जरूर जालें त्याकरिता कारकुनाकडून व गडोगडी गल्ला असेल तो देववून जैसी तैसी पागेची बेगमी केली आहे. त्यास, तुम्ही मनास ऐसा दाणा, रातीब, गवत मागाल, असेल तोवरी धुंढी करून चाराल. नाहीसें जालें म्हणजे मग काही पडल्या पावसात मिळणार नाही, उपास पडतील, घोडी मरायास लागतील म्हणजे घोडी तुम्हीच मारिली ऐसे होईल व विलायतीस तसवीस देऊ लागाल. ऐशास, लोक जातील कोण्ही कुणब्याचे थील दाणे आणील, कोण्ही भाकर, कोण्ही गवत, कोण्ही फाटे, कोण्ही भाजी, कोण्ही पाले. ऐसे करू लागलेत म्हणजे जी कुणबी घर धरून जीवमात्र घेऊन राहिले आहेत, तेहि जाऊ लागतील. कितेक उपाशी मराया लागतील. म्हणजे त्याला ऐसे होईल, की मोगल मुलकांत आले त्याहुनहि अधिक तुम्ही! ऐसा तळतळाट होईल! ....... रयतेस काडीचा अजार द्यावया गरज नाही. ........ कोण्हावरी जुलूम अगर ज्याजती अगर कोण्हासी कलागती करावयाची गरज नाही. ........ हाली उनाळ्याला आहे ........ कोण्ही आगट्या करितील, कोण्ही भलतेच जागा चुली, रंधनाळा करितील .......... आगट्या जाळीता, अगर रात्रीस दिवा घरांत असेल, अविस्राच उंदीर वात नेईल, ते गोष्टी न हो. आगीचा दगा न हो.........'' शिवरायांचे हे पत्र मुळातूनच वाचण्यासारखे आहे. लष्करातील लोकांनी काटकसरीने वागावे. स्थानिक रयतेला त्रास देऊ नये. शेतकऱ्यांच्या काडीलादेखील हात लावू नये; अन्यथा रयत म्हणेल की मोगलापेक्षा तुम्ही वाईट आहात. आगीपासून धोका होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचना शिवरायांनी आपल्यासैनिकांना दिलेल्या आहेत. यातून शिवरायांचा मानवतावाद प्रकर्षाने जाणवतो. शिवरायांनी शेतकरी कष्टकरी, श्रमकरी वर्गाचे हित जोपासले. आपल्या सैनिकांवर सहकाऱ्यांवर जिवापाड प्रेम केले. २ सप्टेंबर १६६० रोजी शिवाजी महाराजांनी कान्होजी जेधे यांना एक पत्र लिहिलेले आहे. कान्होजी जेधे आजारी असल्याची माहिती मिळाल्यामुळे महाराज त्यांना लिहितात,""औसध घेऊन शरीरासी आरोग्य होई ते करणे. उपचाराचे विशी आलस न करणे... औषधोपचार घेऊन बरे होणे. त्याबाबत हयगय करू नये,'' असा अत्यंत मायेचा सल्ला शिवरायांनी कान्होजी जेधेंना दिलेला आहे. शिवाजी महाराजांची अनेक पत्रं आहेत. त्यातून शिवरायांची संवेदनशीलता, प्रेमळपणा, वक्तशीरपणा, शिस्त, व्यवस्थापन, धर्मनिरपेक्षता, नैतिकता, प्रशासनव्यवस्था याची माहिती मिळते. शिवाजी महाराजांच्या पत्रावरून लक्षात येते की, शिवरायांचे स्वराज्य हे रयतेचे लोककल्याणकारी राज्य होते

Wednesday 2 May 2012


शिवाजी महाराजांची तलवार

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ८ प्रमुख तलवारी होत्या,त्यातील सर्वात महत्वाची तलवार फिरंगी किवा भवानी तलवार जी सध्या रोयाल ब्रिटीश संघ्रलाय इंग्लंड मध्ये आहे.
शिवाजी महाराजांनी फिरंगी तलवार उर्फ भवानी तलवार portuguese ...व्यापार्यांकडून विकत घेतली होती.असा म्हंटल्या जाते नंतर शिवरायांनी भवानी मातेसमोर त्या तलवारीची प्रतीस्तापणा केली आणि त्या ताल्वारीमध्ये तोडासा बदल करून तिचे नाव भवानी तलवार ठेवले.
फिरंगी तलवार उर्फ भवानी तलवार ३५ ते ३८ इंची लामब असते ,फिरंगी तलवारला single sided किवा double sided धार असते.व तलवारीची मुठ स्टील ची असते.शिवरायांनी फिरंगी तलवार मध्ये काही बद्दल देखील केले,ते म्हणजे तलवारीच्या मुठीमध्ये कापुसाची गाधी भरली जेणेकरून ती सैनिकांना घाम आल्यावर तलवार हातातून निसटणार नाही.
काही दैववाद करणाऱ्या इतिहासकारांनी असे सांगितले आहे कि शिवरायांना भवानी तलवार स्वयं भवानी मातेने प्रगट होऊन दिले आहे.
जर भवानी मातेने शिवाजी महाराजांना भवानी तलवार दिली तर मग त्याच प्रकारची तलवार शाहजहान ह्या मुस्लीम शासकाकडे व बाजीराव पेशव्याकडे कोठून आली,शाहजहान आणि बाजीराव पेशव्याला पण भवानी माता प्रसन्ना झाली होती का?
सध्या फ्रेंच इतिहासकार फ्रान्सीस gouitier ह्या फ्रेंच इतिहासकाराने भवानी माता शिवरायांना तलवार देतांनाचा पुतळा बनवला आहे,अश्या स्वरूपाचे पुतळे उभारून आपण जिजामाता व शिवरायांचे कर्तुत्व नाकारत आहोत का?
ज्या शिवरायांनी मंगठीच्या झोरावर स्वराज्य निर्माण केले त्याला दैव वादाचे रूप देणे योग्य आहे का?शिवरायांना देवी प्रसन्ना झाली म्हणून ते स्वराज्य निर्माण करू शकले असा प्रचार करणे योग्य आहे का?
ज्या प्रकारे राम आणि कृष्ण ह्यांना विष्णूचा अवतार घोषित करून त्यांचा वापर दान आणि दक्षिणा मिळवण्यासाठी भटांनी केला तसाच प्रकारे मराठा साम्राज्याचा बाबतीत भाकड कथा रचणे योग्य का?छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी मातेने स्वतः प्रगट होऊन तलवार दिली होती आणि त्याच तलवारीला भवानी तलवार म्हणतात असा अपप्रचार देशभरात करण्यात आलेला आहे.काही इतिहास्कारांनीच असा अपप्रचार केलेला आहे.छ.शिवाजी महाराजांचे कर्तुत्व लोकांपर्यंत पोहोचूनही अशा या अपप्रचाराने कर्तुत्वप्रधान महाराष्ट्रिय समाज दैववादी बनून बसला आणि महाराजांना भवानी मातेचा आशीर्वाद होता म्हणूनच ते इतके पराक्रम करू शकले आणि संकटातून नेहमी वाचत राहिले असाच विचार समाजमनात पेरला गेला.चांगल्या नशिबाशिवाय काहीच करता येत नाही असे लोक समजू लागले.या इतिहासकारांनी असा प्रचार का केला हे त्यांनाच माहित असेल.त्यांनी असे चुकून केले असे समजायला आपण काही मूर्ख नाही कारण सावंतवाडी जवळील कुडाळ नावाच्या गावातून एका पोर्तुगीज व्यापाऱ्याकडून ३०० होण (१०५० रुपये) रोख देऊन ही तलवार विकत घेतल्याची नोंद महाराजांनी त्यांच्या दफ्तरात(accounts मध्ये) करून ठेवलेली आहे.महाराज केलेला प्रत्येक खर्च दफ्तरात लिहित असत कारण हिशोबात पक्के असण्याचा महाराजांचा कटाक्ष होता.५ मार्च १६५९ ला ही तलवार विकत घेतल्याचे येथे नमूद केले आहे.असे असूनही या इतिहासकारांनी असल्या प्रकारचा अपप्रचार का केला असावा हे समजण्याइतके आपण सर्व सुध्न्य आहात.पुन्हा जर कुणी छ.शिवरायांच्या तलवारीच्या बाबतीत असा अपप्रचार केला तर आपण कुणीही या भूलथापांना बळी पडू नये.आपल्या कर्तुत्वावर विश्वास ठेऊन पुढील जीवन जगण्याचा मनोनिग्रह करूया.
..................छ.शिवाजी महाराज की जय.............




Sunday 29 April 2012

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

                                                 '''या भारतात बंधूत्व नित्य वासु दे '''
आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती खंजीरी वादनासारख्या लोक कलेतून समाजाचे प्रभोधन करनारे महाराजानी सर्व धर्माच्या लोकांनी मानवता धर्माचे पालन करून विश्वबंधूत्वाची जपवनूक करायला हवी असा दिव्य संदेश दिला त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य त्यांचा देह समाज कल्यानासाठी चंदनाप्रमाने झिजवला १९६८ साली ते कर्क रोगाने ग्रासले असतांना मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जवळ त्यांनी त्यांच्या भावना बोलुन दाखवल्या '' मला शेकडो विँचूने चावल्याच्या वेदना होतात त्या मी सहन करू शकतो माझ्या ग्रामिण भागातील गरीब लोकांना मोठ्या शहरात जाउन माहागडे उपचार करने शक्य नाही म्हणून मी आपणास विनंती करतो कि त्यांच्या उपचारासाठी कँन्सर हाँस्पीटल काढावे '' येवढ्या मोठ्या विचाराचा विचारवंत एवढ्या वरच थांबला नाही ग्रामगीते सारखे ग्रंथ लिहुन पूर्ण समाजाला स्वंच्छंतेचे महत्त्व त्यांनी सांगीतले राष्ट्रपतीने राष्ट्रसंत अशी सनमान देवून गौरवीले हा ग्रंथ म्हणजे श्रवण पठणाची पोथी नसून प्रत्यक्ष कृतीकार्यक्रमाचा अजेंडा आहे असे ते म्हणत स्वांनूभवाच्या भक्कम आधारावर ग्रामीण पूर्नरचनेची ही अष्टपंचांग योजना आहे जीवनाचेसार या ग्रामगीतेत आहे ग्रामीण सुधारना पूर्नरचना आधूनीक प्रगती या ग्रंथामूळे होऊ शकते हे त्यांनी दाखवून दिले जयंती पूण्यतीथि साजरी करण्यासोबतच समाजाने सक्रिय व्हावे आणि या राष्ट्रसंतानी सांगितलेला मार्ग आपणा पासून स्वतःच्या घरापासून गावापासून प्रारंभ कराने व राष्ट्रधर्म विश्वबंधूत्वा निर्माण करून आपले राष्ट्र बलवान करने हेच या राष्ट्रसंताला आजच्या दिवशी खरी वंदना असेल अश्या या थोर राष्ट्रसंताला त्याच्या जयंती निमीत्य मानाचा मुजरा

Thursday 26 April 2012

शिवजन्माची पहाट

सूर्यकीरणे गारव्याला होती जाळत शिवनेरीवर भगवाही होता खेळत , येणार्‍या नव्या पर्वाची लागली होती चाहूल शिवजन्मान पडणार होत पहिल मराठी पाउल ... मराठ्यांचा प्रत्येक आश्रू जिजाउन साठवला होता , आई भवानीस तेच आश्रू देऊन पोटी मराठ्यांचा धनी मागितला होता ... मंदिर थराराली , शिवनेरीची तोफ कडाडली वार्‍याची कोवळी झुळुक दर्‍या खोर्‍यात दरवळली , जिजाउपोटी मराठ्यांचा राजा अवतरला सांगत मुकी पाखरही किलबीलली .... नगारा वाजला ,शाहिरी साज चढला डंका डोंगरा आड सांगत सुटला , आता सह्याद्रीवर भगवा फडकनार मराठ्यांची तलवार शत्रूवर धडकनार .... इतिहासच पाहील पान शिवजन्मान लिहाल गेल होत , हिरव्या दगडावर आता भगवे रक्त स्वराज्याचा इतिहास कोरत होत ...

Saturday 21 April 2012

Bhagat singh , atheism and message to indian students

bhagat singh,During his teenage years, he began to question religious ideologies after witnessing the Hindu-Muslim riots that broke out after Gandhi disbanded the Non-Cooperation Movement . He did not understand how members of these two groups, initially united in fighting against the British, could be at each others' throats because of their religious differences. At this point, Singh dropped his religious beliefs, since he believed religion hindered the revolutionaries' struggle for independence, and began studying the works of Bakunin , Lenin , Trotsky — all atheist revolutionaries. He also took an interest in Niralamba Swami'sbook Common Sense, which advocated a form of "mystic atheism". While in a condemned cell in 1931, he wrote a pamphlet entitled Why I am an Atheist ? in which he discusses and advocates the philosophy of atheism . This pamphlet was a result of some criticism byfellow revolutionaries on his failure to acknowledge religion and God while in a condemned cell, the accusation of vanity was also dealt with in this pamphlet. He supported his own beliefs and claimed that he used to be a firm believer in The Almighty, but could not bring himself to believe the myths and beliefs that others held close to their hearts. In this pamphlet, he acknowledged the fact that religion made death easier, but also said that unproved philosophy is a sign of human weakness. (this article is taken from wikipedia.com)

Friday 13 April 2012

१४ एप्रिल भारतारत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्य विनम्र अभिवादन

आधुनिक भारताच्या जडणघडणीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान ऐतिहासिक स्वरूपाचे आहे. मात्र असे असूनही आपल्या एकूणच सार्वजनिक जीवनात त्यांचे हे ऐतिहासिक योगदान ध्यानात घेतले जात नाही, ही या देशाची एक फार मोठी शोकांतिका आहे. डॉ. आंबेडकरांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच े विविध पैलू पाहिले की कुणीही आश्चर्याने थक्क व्हावे. अमेरिकेतील विश्वविख्यात कोलंबिया विद्यापीठ आणि इंग्लंडमधील लंडन विद्यापीठ (सध्याचे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स) या दोन विद्यापीठांच्या अनुक्रमे पीएच. डी. आणि डी. एस्सी. या पदव्या घेतलेला एक श्रेष्ठ अर्थशास्त्रज्ञ; 'मूकनायक' आणि 'बहिष्कृत भारत'चे झुंजार संपादक; जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता यांची समाजशास्त्रीय आणि मानववंशशास्त्री यदृष्ट्या सखोल मीमांसा करून त्यांच्यामुळेकेवळ अस्पृश्यांचेच नव्हे, तर सबंध भारतीय समाजाचे कसे अतोनात नुकसान झाले आहे, हे प्रभावीपणे सांगणारे एक दष्टे विचारवंत; 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' हा ग्रंथ लिहून बुद्धांच्या समग्र तत्त्वज्ञानावर भाष्य करणारा आणि त्या तत्त्वज्ञानाचा प्रचलित मानवी समाजाला अत्यावश्यक असलेला संदर्भ सांगणारा एक तत्त्वज्ञ; राजकीय अर्थशास्त्र आणि प्रशासनाचे नावाजलेले प्राध्यापक; विधी महाविद्यालयाचे प्राचार्य; मुंबई उच्च न्यायालयात वकिली करणारे एक निष्णात बॅरिस्टर; कोकणातील अन्यायकारक खोती पद्धत नष्ट करण्यासाठी मुंबई विधिमंडळात विधेयक मांडणारे गरीब शेतकऱ्यांचे खरेखुरे कैवारी. १९४२ ते १९४६ या चार वर्षांत व्हाईसरॉयच्या एक्झिक्युटिव्ह कौन्सिलमध्ये असताना या देशातील कामगारांचे सर्व प्रकारचे हित जोपासण्यासाठी कायदे करण्यात पुढाकार घेणारे निभीर्ड मजूरमंत्री. भारतातील स्त्रियांच्या समान अधिकारांची सनद असलेल्या हिंदू कोड बिलाचे निर्माते आणि सरकारमध्ये ते मान्य होत नाही, असे दिसताच स्वतंत्र भारताच्या पहिल्या कायदेमंत्रीपदाच े राजीनामा देणारे 'स्वाभिमानी' केंदीय मंत्री! (अर्थात हिंदू कोड बिल हे राजीनाम्याचे एक प्रमुख कारण होते.) हे वर्णन आणखीही वाढविता येईल. डॉ. आंबेडकरांच्या व्यक्तिमत्त्वाच े हे पैलू मी थोड्याशा विस्ताराने इथे अशासाठी सांगितले की भारतातील एकही समाजघटक त्यांच्या ऋणातून मुक्त नाही. तरीही देशभर आणि सबंध जगात पसरलेले त्यांचे अनुयायी सोडले, तर एकूण भारतीय समाजाने त्यांच्या या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच ी दखल घेतलेली दिसतनाही. अस्पृश्यांचे, फार तर दलितांचे पुढारी, आणि वस्तुस्थिती नाकारता येत नाही म्हणून 'भारतीय घटनेचे शिल्पकार' इथपर्यंतच त्यांचीओळख आहे. अनेकांना तर राखीव जागांच्या धोरणांचा आग्रह धरून त्यांनी गुणवत्तेची आणि कार्यक्षमतेची वाट लावली, असेच वाटते. शेकडो वर्षांच्या जातिव्यवस्थेने निर्माण केलेल्या संकुचित आणि खंडित मनोवृत्तीचेच हे निदर्शक आहे. खरे पाहता, डॉ. आंबेडकर यांनी या देशाच्या जवळ जवळ प्रत्येक प्रश्नाचा अगदी मुळाशी जाऊन विचार केलेला आहे. इतकेच नव्हे, तर अशा प्रश्नांची सोडवणूक कशी करावी, यासबंधी वेळोवेळी उपाययोजनाही सांगितली आहे. आर्थिक धोरण, संसदीय लोकशाही, परराष्ट्रीय आणि संरक्षणधोरण, भाषावार प्रांतरचना, शिक्षणप्रणाली व विद्यापीठांचीपुनर्रचना, पाणी-धरणे-वीजवि षयक धोरण, नद्यांच्या पाणीवाटपावरून शेजारच्या राज्यातील तंटे... देशाचा अगदी एकही प्रश्न त्यांच्या नजरेतून सुटला नाही. काळाच्या ओघात या उपाययोजनेचा पुनविर्चार वा तिची पुर्नमांडणी होणे शक्य आहे. उदा. त्यांनी जमिनीचे राष्ट्रीयीकरण करण्याचा कार्यक्रम सांगितला. समाजवादी क्रांती झाल्यानंतर ज्या ज्या देशांनी शेतीचे राष्ट्रीयीकरण केले, तिथे तो प्रयोग यशस्वी झाला नाही. मात्र, हे जरी खरे असले, तरी भारतामध्ये केवळ २०-२५ टक्के मोठ्या व मध्यम शेतकऱ्यांच्या हातात ७० टक्क्यांहून अधिक शेतजमीन असल्यामुळे मुबलक अन्नधान्य पिकवूनही देशातील किमान एक-चतुर्थांश लोक दारिद्यरेषेखाली राहतात, ही गोष्ट आपल्याला नजरेआड करता येत नाही. देशाच्या प्रश्नांचा इतका समग्र, विस्तृत आणि सखोल विचार त्यांनी का केला असेल? आणि तोही कोणत्या ना कोणत्या निमित्ताने त्यांना सतत अवहेलना सहन करावी लागली तरीही?याचे एकच उत्तर आहे. डॉ. आंबेडकर हे प्रखर देशभक्त होते. त्यांची राष्ट्रनिष्ठा शंभर नंबरी सोन्यासारखी होती. दोन-अडीच हजार वर्षांच्या जातिव्यवस्थेविर ुद्ध अगदी एकाकीपणे संघर्ष करणे, ही भारतीय इतिहासाने त्यांच्यावर टाकलेली जबाबदारी होती. खरे म्हणजे, ती यशस्वीपणे निभावून भारतीय स्वातंत्र्यलढ्य ाला सामाजिक आशय देण्याचे ऐतिहासिक कार्यच त्यांच्या हातून घडले आहे. हा आशय प्रत्यक्ष देण्याची संधी जेव्हा त्यांना घटनासमितीच्या मसुदा समितीच्या अध्यक्षपदामुळे मिळाली, तेव्हाही त्यांनी त्या संधीचे सोने केले. पर्वत, नद्या, डोंगर, फुले आणि फळे ही राष्ट्राच्या अस्मितेची प्रतिके आहेत, हे खरे. परंतु मुळात राष्ट्र हीसंकल्पनाच माणसाने निर्माण केली. म्हणून राष्ट्राचा खरा नायक माणूस आणि राष्ट्र म्हणजे माणसा-माणसांतील संबंध. हे संबंध समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय यावर आधारलेले असावेत, हा डॉ. आंबेडकरांचा आग्रह होता. आज भारतात (आणि जगात इतरत्रही) खऱ्या अर्थाने तसे ते नाहीत, ही त्यांची खंत होती. ते तसे का नाहीत आणि ते कसे निर्माण करता येतील, हे कळण्यासाठी या देशाने आंबेडकर समजून घेणे आवश्यक आहे

Wednesday 28 March 2012

क्रांतिसिंह नाना पाटील

सामान्यतः सर्व समाज अगर माणसे कालप्रवाहाप्रमाणे वाहत जाण्यात धन्यता मानतात आणि यातच आपला मोठेपणा सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. परंतु जगाच्या इतिहासात अशा काही अद्वितीय व्यक्ती जन्माला येतात कि त्या सबंध कालचक्रालाच आपल्या कल्पनेप्रमाणे गती देतात. यातच त्यांचे मोठेपण सामावलेले असते. आणि हे विचार क्रांतिसिंह नाना पाटील यांना तंतोतंत लागू पडतात.

क्रांतीसिहांचा जन्म सांगली जिल्ह्यातील बहे-बोरगाव या छोट्याशा गावी ३ ऑगस्ट १९०० रोजी झाला. लहानपणापासूनच दणकट शरीरयष्टी लाभलेल्या नानांनी भारताला सामाजिक आणि राजकीय गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी तीव्र संघर्ष केला. स्वातंत्र्यपूर्व काळात ‘आधी राजकीय स्वातंत्र्य कि सामाजिक सुधारणा’ असा वाद अस्तित्वात होता. काहींनी आधी राजकीय स्वातंत्र्य योग्य मानले तर काहीना आधी सामाजिक सुधारणा इष्ट वाटत होत्या. परंतु नानांनी राजकीय स्वातंत्र्याबरोबरच सामाजिक सुधारणा घडवून आणण्याचे महत्कार्य पार पाडले, हे नानांच्या कार्याचे वेगळेपण आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महाराष्ट्राने विशेषतः सातारा-सांगली भागाने बहुमोल योगदान दिले आहे. याच भागातून पुढे आलेल्या नानांनी समविचारी तरुणांना एकत्र करून भारतीय स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ रोवली.

नाना सुरुवातीला तलाठी म्हणून नोकरीला होते. परंतु स्वातंत्र्याचे आंदोलन ऐन जोमात असताना नानांचे मन नोकरीत रमले नाही. त्यांनी नोकरी सोडून सक्रीय राजकारणात व समाजकारणात सहभाग घेतला. सातारा भागात प्रतिसरकार ही समांतर शासनव्यवस्था उभी करून ब्रिटीश सत्तेला चांगलाच चाप लावला. नानांनी तुफानी सेना ही सशस्त्र क्रांतीकारकांची संघटना बांधली. तुफानी सेनेच्या माध्यमातून इंग्रजी सत्तेला सळो कि पळो करून सोडले. ब्रिटीश सत्तेचा प्राण असणाऱ्या रेल्वे सेवा, पोस्ट सेवा आदी सेवांवर हल्ले करून, ब्रिटीशांचा खजिना लुटून नानांनी स्वातंत्र्यलढ्यासाठी त्याचा उपयोग केला.

१९३० चे सविनय कायदेभंग आंदोलन आणि १९४२ चे चाले जाव आंदोलन यात नानांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सक्रीय सहभाग नोंदवला. १९४२ पर्यंत नानांनी अनेकवेळा तुरुंगवास भोगला. १९४२ नंतर मात्र नाना भूमिगत झाले. ब्रिटीश सरकारने त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी हरप्रकारे प्रयत्न केले. त्यांच्या घरावर जप्ती आणली. त्यांच्या कुटुंबियांना त्रास दिला. नानांची जमीनही सरकारजमा केली गेली. परंतु घरावर तुळशीपत्र ठेवून स्वातंत्र्याच्या भुकेने बाहेर पडलेल्या नानांचा त्याग ब्रिटिशांना काय माहित ? या धावपळीच्या काळात आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्यायला नानांना वेळ मिळाला नाही. यातच नानांच्या मातोश्रींचे निधन झाले. स्वतःच्या आईचे अंत्यसंस्कार करण्यासाठी तरी नाना येतील म्हणून ब्रिटिशांनी पूर्ण बंदोबस्त लावला. तेव्हा नानांनी आपला जीव धोक्यात घालून आईचे अंत्यसंस्कार केले. मात्र ब्रिटिशांच्या तावडीत ते सापडले नाहीत. सामान्य जनतेची नानांना फार मोठी साथ लाभली. समाज नानांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याने ब्रिटीश सरकार नानांना पकडू शकले नाही. भारताला अधिकृतरीत्या १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले असले तरी सातारा सांगली भाग नानांच्या प्रयत्नांमुळे १९४२ पासूनच स्वतंत्र झाला होता. सातारा-सांगली भागात प्रतिसरकार कार्यरत असताना ब्रिटीश सत्तेचा मागमूस या भागातून जवळजवळ पुसून टाकण्यात आला होता.

सामाजिक कार्य-

नानांनी प्रतीसरकारच्या माध्यमातून जसे ब्रिटीशांविरुद्ध सशस्त्र आंदोलन उभे केले होते तसेच समाजात एक चांगली शासनव्यवस्था निर्माण केली होती. भांडणतंटे सोडवण्यासाठी लोकन्यायालयाची स्थापना करण्याचे महत्वाचे कार्य नानांनी केले होते. व्यसनमुक्तीसाठीही नानांनी प्रतीसरकारच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले. बहुजन समाजात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटलांच्या खांद्याला खांदा लावून नाना उभे होते. गावोगावी ग्रंथालये उभी करून समाजपरिवर्तनात मोलाची कामगिरी बजावली. नानांवर महात्मा फुल्यांचा व सत्यशोधक समाजाच्या विचारांचा विशेष प्रभाव होता. भटशाही व सावकारशाही गरीब शेतकऱ्यांना नाडत आहेत म्हणून नानांनी या प्रवृत्तींविरुद्ध आवाज उठवला. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामीही नानांचे योगदान खूप आहे. सातारा-सांगली भागात सुमारे १५०० गावात नानांचे प्रतिसरकार कार्यरत होते. सामान्य बहुजन समाज व शेतकऱ्यांवर होणाऱ्या प्रत्येक अन्यायाला प्रतिसरकारच्या माध्यमातून वाचा फोडली जाई. त्यामुळे सामान्य जनतेला प्रतिसरकार आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याबद्दल फार आत्मीयता होती.

सामान्य जनतेच्या सहभागावर आधारलेला विकेंद्रित लोकशाहीचा छोटा पण वेगळा प्रयोग म्हणजे प्रतिसरकार होय. नानांच्या प्रतीसरकारचा प्रयोग देशात इतरत्रही राबवला गेला. दारूबंदी, न्यायव्यवस्था, गुंडांचा बंदोबस्त, अस्पृश्यता निवारण, सावकारांकडून होणारी शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवणे, कमी खर्चात लग्ने लावणे असे प्रतीसरकारचे कार्यक्रम सामान्य बहुजन समाजाने उचलून धरले. समाजाला नाडणाऱ्या सावकारादि प्रवृत्तींना नानांच्या प्रतीसरकारचा चांगलाच धाक होता. गरीब शेतकऱ्यांवर, बहुजन समाजावर अन्याय करणाऱ्या बड्या धेंडांना प्रतीसरकारने पत्र्या ठोकल्या. त्यामुळे प्रतीसरकार हे ‘पत्रीसरकार’ म्हणूनही ओळखले जावू लागले. आज खर्चिक विवाह समाजामध्ये आर्थिक व सामाजिक ताण निर्माण करताना दिसत आहेत. परंतु त्याकाळी फक्त पंधरा रुपयात बहिणीचा व वीस रुपयात मुलीचा विवाह करणारे क्रांतिसिंह खरोखर कृतीवीर होते.

स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर गोरगरीब, दीनदलित व शोषितांसाठी आयुष्यभर लढत राहणाऱ्या क्रतीसिहांच्या कर्तुत्वाची महती आजच्या पिढीला समजली पाहिजे. सध्या स्त्री-शिक्षण व स्त्री सक्षमीकरणावर बोलले जात असले तरी शंभर वर्षापूर्वी स्वताच्या पत्नीला साक्षर करून समाजाला नवी दृष्टी देणारा हा दूरदृष्टा विरळच होता. या भूमीतील कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाची गंगा खेड्यापाड्यात पोहचवली, तर क्रांतीसिहानी स्वातंत्र्य चळवळीचे, सामाजिक सुधारणांचे लोण गावोगाव पसरवले. स्वातंत्र्य चळवळीबरोबरच त्यांनी शिक्षणप्रसार, स्त्री शिक्षण, व्यसनमुक्ती, हुंडाबंदी, जातीभेद निर्मुलन, अंधश्रद्धा निर्मुलन यासारख्या विषयांवरही सामाजिक प्रबोधन केले. “बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले” या उक्ती नानांना तंतोतंत लागू पडतात.

राजकीय कार्य-

त्याकाळी बहुजन समाजाला राजकीय नेतृत्व नव्हते. तत्कालीन कॉंग्रेसचे नेतृत्व उच्चवर्णीयांच्या हातात होते. त्यांना गरीब बहुजन समाज व शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे नव्हते. परिणामी बहुजन समाजाची खूप उपेक्षा होत होती. कॉंग्रेसची घडण ही परंपरागत चातुर्वर्ण वर्गाच्या नावाखाली चालत होती. त्यातून बहुजन समाजाच्या आर्थिक सोयीचे व कामाचे चीज होईल असे दिसत नव्हते. म्हणून महाराष्ट्रातील सर्व सत्यशोधक पुढाऱ्यांनी मिटींग घेतली. या मिटींगमध्ये कॉंग्रेस अंतर्गतच शेतकरी कामगार पक्षाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. सत्यशोधक कार्यकर्त्यांनी गावोगाव सभा-मिटिंग घेवून बहुजन समाजाला आपली भूमिका समजावून सांगितली. नानांनी यावेळी जनजागृतीसाठी केलेले दौरे महाराष्ट्रभर तुफान व वेगवान असे झाले. सर्वत्र नाना पाटील, जेधे, मोरे, जाधव आदींचा जयजयकार होवू लागला. सुरुवातीला शेतकरी कामगार पक्ष हे कॉंग्रेस अंतर्गतच एक संघटन होते. परंतु कॉंग्रेसच्या उच्चवर्णीय पुढाऱ्यांनी ‘महाराष्ट्रात कॉंग्रेस अंतर्गत कोणताही राजकीय पक्ष राहू शकत नाही’ असा ठराव पास करून घेतला. त्यांचे विचार व पद्धती न पटल्याने बहुजन समाजातील कार्यकर्ते कॉंग्रेसमधून बाहेर पडले व स्वतंत्र शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली.

नाना फक्त एक लढाऊ स्वातंत्र्यसैनिक होते असे नाही तर ते एक उत्तम वक्ते, पुरोगामी विचारवंत होते. त्यांचे विचार सहज-सुलभ व सर्वसामान्यांना समजेल असे होते. भाषांशैली लोकाभिमुख होती. आपल्या विचारांमुळे व कार्यामुळे ते सर्वसामान्य जनतेत लोकप्रिय झाले होते. ते १९५७ साली सातारा उत्तर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. १९६७ मध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या तिकिटावर बीड मतदारसंघातून निवडून आले. शेकाप व कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून नानांनी बहुजन समाजाच्या व शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. संसदेत मराठीतून भाषण करणारे ते पहिले खासदार होते.

आज नानांचे कार्य बहुजन समाजाने समजून घेणे गरजेचे आहे. नानांच्या कार्याचे खरे मूल्यमापन झाल्याशिवाय त्यांच्या कार्याचे चीज होणार नाही. कथा, कादंबऱ्या, चित्रपट अशा अनेक माध्यमातून नानांचे कार्य उपेक्षित राहिले आहे. नानांच्या जीवनावर, कार्यावर यापुढे अधिकाधिक साहित्यनिर्मिती करणे हीच क्रांतीसिहांना खरी आदरांजली ठरेल.

Monday 26 March 2012

मराठा व कुणबी ह्या दोन भिन्न जाती नसून एकच आहे

मराठा समाज कुणबी असल्याचे पुरावेमराठा समाज कुणबी असल्याचे असंख्य पुरावे देता येतील. वास्तविक पाहता मराठा व कुणबी या दोन्ही भिन्न जाती नसून एकच आहे. (सन १८८१ पासून १९३१ पर्यंतच्या ५० वर्षाच्या गॅझेट मध्ये मराठा कुणबी असल्याचा उल्लेख केला जातो) पुरावा १ :- १९८१ च्या जनगणनेत मराठ्यांचा कुणब्यांमध्ये समावेश केला होता. संदर्भ :- Bombay Gazetter Satara, Vol. XIX, Page 75, Marathas are found all over the district. The 1981 Census includes them under "Kunbi" from whom they do not forma separate caste. पुरावा २ :- मराठा व कुणबी यांचा समावेश कुणबीह्या शब्दात होतो. या दोघांमध्ये भेद दर्शविणे कठीण आहे. या दोघांमध्ये परस्पर रोटी व बेटी व्यवहार चालतो. त्यांचे रूप, रंग,धर्म कर्म, रीती रिवाज यात काही फरक नाही. संदर्भ :- Bombay Gazeteer, Poona Vol. XVIII, Part-I. The term kunbi includes two main classes "Kunbis" and "Marathe" between whom it is difficult to draw a line. Maratha and Kunbi eat together, intermarry and do not differ in appearance, religion and caste. पुरावा ३ :- "मराठा" व "कुणबी" यांच्यातील लग्न वैध असल्याचा व मराठा व कुणबी एकच असल्याबद्दल कोर्टाचा निकाल. संदर्भ :- Civil Suit No. 2 of 1920 decided on 25-10-1921 to judgement Maratha caste is genus while Kunbi caste is in species and that marriage between Maratha and Kunbi are Kunbi and perfectly valid in law. पुरावा ४ :- Gazetter of India M.S. Parbhani Dist. Page 103 : No Permanent division between Kunbi and Maratha, वर उल्लेख केलेल्या पुराव्यावरून हे सिद्ध होते की, 'मराठा' व 'कुणबी' ह्या दोन भिन्न जाती नसून एकच आहे. शेती करणारे मराठा म्हणजेकुणबी.संदर्भ :- मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने दिलेला निर्णय आहे. व अमरावती कोर्टाच्या निर्णयानुसार शेती करणारा हा कुणबी हा स्पष्ट होता. शेती करणारा मराठा म्हणजेच कुणबी हे सिद्ध करणारे पुरावे पुरावा १ :- Gazetter of India, M.S. Aurangabad District Page 293. The Kunbis from the main body of agricultural population the members of which by heridatary occupation are farmers and tillers of soil. पुरावा २ :- Gazetter of India, M.S. Wardha Dist. Page 148 - "Kunbi has come to be the accepted type of all Maratha cultivator" सर्व मराठा शेतकरी कुणबी आहेत. पुरावा ३ :- Gazetter of India, M.S. Wardha Dist. Page 160 - "Kunbi are regular agricultural caste of district" कुणबी ही नियमित शेती करणारी जात आहे. पुरावा ४ :- Gazetter of India, M.S. Nagpur Dist. Page - The Kunbi is traditional. The term Kunbi has become the generic name for professional cultivator. कुणबी हे परंपरागत व्यवसायाने शेतकरी आहेत. सर्व संदर्भाद्वारे हे सिद्ध होते की, शेती करणारा मराठा म्हणजेच "कुणबी" म्हणून महाराष्ट्रातील सर्व शेती करणा-या मराठ्यांना "कुणबी" या जातीने ओळखले जावे. श्री. एफ.ई. इथावेन यांनी त्यांच्या मुंबईच्या जाती व जमाती खंड-३ या पुस्तकात 'कुणबी' या नावाखाली येणा-या जातींचे विश्लेषण केले आहे ते असे. वर्ग-१ :- मराठा कुणबी - शेती करणारे मराठा यांचा समावेश या वर्गात होतो. यांनाच कुळवाडी असे म्हणतात. वर्ग-२ :- इतर मराठा - यात गवंडी, कुंभार, सुतार, परीट यांचा समावेश होतो. पुरावा :- Imperial Gazetter of India (New edition) Volume XVI. "Maharashtra is country of Maratha who form 55 percent of its population. The term Maratha is not reserved for the old fighting stock a hardy and various class once the terror of India now merged very largly in the cultivating class known as kunbi". कुणब्यांनाच मराठा म्हटलेले जाते असा पुरावा पुरावा :- तत्कालीन हैद्राबाद संस्थानाने प्रसिद्ध केलेले गॅझेटीअर The term Maratha is now applied principallyto the are Kunbis. It should be unframed to the military family of the countries. The Kunbis from main body of the cultivator population. पुरावा :- जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती समाज कल्याण, म.रा. पुणे यांनी त्यांच्या क्र.जा.प्र.क्र./अपील क्र. ४/९६/कांताबाई इंगोले ९६-९७/का-२०६३ पुणे, दिनांक १६-१२-९६ वक्र.जा.प्र.प./ अपील क्र. १०/९६/ बा.द.पाटील/९६-९७/का-२०४२, पुणे दि. ०९-१२-९६. या दोन्ही निर्णयात शेती करणारा मराठा म्हणजे कुणबी असा निर्णय दिला आहे. हा निर्णय सर्वांसाठी लागू करावा. म्हणून "कुणबी व मराठा" एकच असल्याबद्दलचे वर उल्लेख केलेले इतर आणखी पुरावे सापडतील. तसेच शेती करणारा 'मराठा' म्हणजेच 'कुणबी' या जातीचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी मराठा सेवा संघ प्रयत्नरत आहे. ह्याच आधारावर महाराष्ट्रात मराठ्यांना सरसकट कुणबी संबोधून शासनाच्या ओ.बी.सी. मध्ये लागू असलेल्या सर्व शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय इत्यादी सवलती त्वरीत द्याव्यात.